शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

नागपूर जिल्ह्यातल्या सिंचन योजनेतील लाभार्थ्यांचा टक्का घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:28 IST

नागपूर जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील १९ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र मागील वर्षभरात याचे लाभार्थी घटले आहेत.

ठळक मुद्दे२०१८-१९ मध्ये अवघ्या ३५० शेतकऱ्यांना अनुदान लाभार्थ्यांमध्ये ९६ टक्क्यांची घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत २०१५ सालापासून नागपूर जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील १९ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र मागील वर्षभरात याचे लाभार्थी घटले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे विचारणा केली होती. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत किती शेतकऱ्यांना लाभ झाला, किती क्षेत्र सिंचनाखाली आले, प्राप्त अनुदान व झालेला खर्च इत्यादीसंदर्भात त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर विभागात २०१५-१६ पासूनच पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू झाली. २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत या योजनेंतर्गत ६० हजार ३९ शेतकºयांचे अर्ज आले होते. यातील २१ हजार १०९ शेतकºयांना प्रत्यक्ष अनुदान देण्यात आले.२०१५-१६ साली म्हणजेच योजनेच्या पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून १ हजार १५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले होते. २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये हा आकडा अनुक्रमे ९ हजार ३६७ व १० हजार ३७७ इतका होता. मात्र २०१८-१९ मध्ये यात प्रचंड घट झाली व केवळ ३५० शेतकऱ्यांनाच अनुदान प्राप्त झाले.अनुदान नेमके किती मिळाले ?नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारांतर्गत पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी प्राप्त झालेले अनुदान व झालेला एकूण खर्च याचे आकडेदेखील देण्यात आले आहेत. मात्र हा निधी केवळ रुपयांमध्ये आहे, लाखांमध्ये आहे की कोटींमध्ये आहे ही बाबच नमूद करण्यात आलेली नाही. मात्र आकडेवारीवरुन एकूण प्राप्त अनुदानापैकी ८१.६५ टक्के रक्कमच खर्च झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.१९ हजार हेक्टरहून अधिक कृषी क्षेत्र सिंचनाखालीपंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह सर्वसाधारण शेतकऱ्यांनादेखील ठिबक सिंचन व तुषार सिंचन संचासाठी अनुदान देण्यात येते. २०१५-१६ पासून जिल्ह्यातील १९ हजार ६३३ हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली आले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प