शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या सिंचन योजनेतील लाभार्थ्यांचा टक्का घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:28 IST

नागपूर जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील १९ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र मागील वर्षभरात याचे लाभार्थी घटले आहेत.

ठळक मुद्दे२०१८-१९ मध्ये अवघ्या ३५० शेतकऱ्यांना अनुदान लाभार्थ्यांमध्ये ९६ टक्क्यांची घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत २०१५ सालापासून नागपूर जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील १९ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. मात्र मागील वर्षभरात याचे लाभार्थी घटले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे विचारणा केली होती. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत किती शेतकऱ्यांना लाभ झाला, किती क्षेत्र सिंचनाखाली आले, प्राप्त अनुदान व झालेला खर्च इत्यादीसंदर्भात त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर विभागात २०१५-१६ पासूनच पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू झाली. २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत या योजनेंतर्गत ६० हजार ३९ शेतकºयांचे अर्ज आले होते. यातील २१ हजार १०९ शेतकºयांना प्रत्यक्ष अनुदान देण्यात आले.२०१५-१६ साली म्हणजेच योजनेच्या पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून १ हजार १५ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले होते. २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये हा आकडा अनुक्रमे ९ हजार ३६७ व १० हजार ३७७ इतका होता. मात्र २०१८-१९ मध्ये यात प्रचंड घट झाली व केवळ ३५० शेतकऱ्यांनाच अनुदान प्राप्त झाले.अनुदान नेमके किती मिळाले ?नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारांतर्गत पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी प्राप्त झालेले अनुदान व झालेला एकूण खर्च याचे आकडेदेखील देण्यात आले आहेत. मात्र हा निधी केवळ रुपयांमध्ये आहे, लाखांमध्ये आहे की कोटींमध्ये आहे ही बाबच नमूद करण्यात आलेली नाही. मात्र आकडेवारीवरुन एकूण प्राप्त अनुदानापैकी ८१.६५ टक्के रक्कमच खर्च झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.१९ हजार हेक्टरहून अधिक कृषी क्षेत्र सिंचनाखालीपंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह सर्वसाधारण शेतकऱ्यांनादेखील ठिबक सिंचन व तुषार सिंचन संचासाठी अनुदान देण्यात येते. २०१५-१६ पासून जिल्ह्यातील १९ हजार ६३३ हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली आले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प