शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभेत काढणार

By आनंद डेकाटे | Updated: August 24, 2024 15:40 IST

राज ठाकरे : मनसेसाठी पोषक वातावरण, आघाडी-महायुती विरोधात स्वतंत्रपणे लढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेले मतदान हे काही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी झालेले मतदान नव्हतं. मुस्लीम आणि दलितांनी जे एकगठ्ठा मतदान केले ते मोदी-शहा यांच्या विरोधात होते. त्यामुळे ती जी वाफ होती ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निघाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. या गलिच्छ राजकारणाला लोक विसरलेले नाहीत. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तेच या महाराष्ट्रात झालेय, अशी परिस्थिती गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बघितली नाही. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राग नक्कीच काढतील, असा विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी व्यक्त केला. 

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शनिवारी रविभवन येथे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येत नाही. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळ‌े मनसे कुणाशीही युती करणार नाही. आम्ही आघाडी-महायुती विरोधात स्वतंत्रपणे लढणार आहोत. राज्यात या दोन्ही आघाडीच्या विरोधात जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करू.  

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार हेच जबाबदार आहेत. हे मी याआधी पण माझ्या जाहीर सभेतून बोललो आहे. कारण या प्रकारच्या राजकारणाला शरद पवारांनीच महाराष्ट्रात सुरुवात केली. त्यानंतर जातीचे विष देखील राज्यात शरद पवारांनीच कालवलं. महापुरुषांची विभागणी कधीही जातीपातीत झाली नव्हती. आमचे संत कधी आडनावांनी ओळखले जात नव्हते. संत आपल्याकडे संत म्हणूनच बघितले जात होते. पण या सर्व गोष्टीची सुरूवात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरच राज्यात सुरु झाल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली.

पोलिसांना फ्री सोडा सर्व व्यवस्थित होईल राज्यातील गुन्हेगारीबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, जितकी माहिती पोलिसांना असते तितकी माहिती कुणालाही नसते. गृहमंत्र्यांना सुद्धा नसते. परंतु पोलिसांवर नेहमीच दबाव टाकला जातो. पोलिसांना त्यांच्या कामासाठी फ्री सोडून बघा सर्व काही सुरळीत होईल, असे राज ठाकरे म्हणाले. 

बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. या आरोपींना ठेचलंच पाहिजे. आज बंद पुकारला. महाविकास आघाडीच्या काळातही हे गुन्हे हाेत होते. तेव्हा का नाही थांबवले. बदलापूरनंतर सातत्यानं अशा घटना उघडकीस येत आहे, त्यामागे काही राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का?” असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेvidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर