शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

राज्यातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभेत काढणार

By आनंद डेकाटे | Updated: August 24, 2024 15:40 IST

राज ठाकरे : मनसेसाठी पोषक वातावरण, आघाडी-महायुती विरोधात स्वतंत्रपणे लढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला झालेले मतदान हे काही शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी झालेले मतदान नव्हतं. मुस्लीम आणि दलितांनी जे एकगठ्ठा मतदान केले ते मोदी-शहा यांच्या विरोधात होते. त्यामुळे ती जी वाफ होती ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निघाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. या गलिच्छ राजकारणाला लोक विसरलेले नाहीत. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तेच या महाराष्ट्रात झालेय, अशी परिस्थिती गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बघितली नाही. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राग नक्कीच काढतील, असा विश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी व्यक्त केला. 

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शनिवारी रविभवन येथे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येत नाही. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळ‌े मनसे कुणाशीही युती करणार नाही. आम्ही आघाडी-महायुती विरोधात स्वतंत्रपणे लढणार आहोत. राज्यात या दोन्ही आघाडीच्या विरोधात जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करू.  

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार हेच जबाबदार आहेत. हे मी याआधी पण माझ्या जाहीर सभेतून बोललो आहे. कारण या प्रकारच्या राजकारणाला शरद पवारांनीच महाराष्ट्रात सुरुवात केली. त्यानंतर जातीचे विष देखील राज्यात शरद पवारांनीच कालवलं. महापुरुषांची विभागणी कधीही जातीपातीत झाली नव्हती. आमचे संत कधी आडनावांनी ओळखले जात नव्हते. संत आपल्याकडे संत म्हणूनच बघितले जात होते. पण या सर्व गोष्टीची सुरूवात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरच राज्यात सुरु झाल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली.

पोलिसांना फ्री सोडा सर्व व्यवस्थित होईल राज्यातील गुन्हेगारीबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, जितकी माहिती पोलिसांना असते तितकी माहिती कुणालाही नसते. गृहमंत्र्यांना सुद्धा नसते. परंतु पोलिसांवर नेहमीच दबाव टाकला जातो. पोलिसांना त्यांच्या कामासाठी फ्री सोडून बघा सर्व काही सुरळीत होईल, असे राज ठाकरे म्हणाले. 

बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. या आरोपींना ठेचलंच पाहिजे. आज बंद पुकारला. महाविकास आघाडीच्या काळातही हे गुन्हे हाेत होते. तेव्हा का नाही थांबवले. बदलापूरनंतर सातत्यानं अशा घटना उघडकीस येत आहे, त्यामागे काही राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का?” असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेvidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर