शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

चीनविरोधात जनतेने आर्थिक युद्ध लढावे - गोविंदाचार्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 8:40 PM

भारताच्या सामरिक सीमेत घुसखोरी करू पाहणा-या चीनने देशात आर्थिक आक्रमण केले आहे. अशा स्थितीत देशाला स्वावलंबी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान लढतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य यांनी केले.

नागपूर, दि. 9 - भारताच्या सामरिक सीमेत घुसखोरी करू पाहणा-या चीनने देशात आर्थिक आक्रमण केले आहे. अशा स्थितीत देशाला स्वावलंबी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान लढतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य यांनी केले. आॅगस्ट क्रांती दिनाचा मुहूर्त साधून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनाचा शंखनाद झाला. यावेळी ते बोलत होते. मानस चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ चिनी वस्तूंची होळी करून बहिष्कार आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अजय पत्की, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक पवन श्रीवास्तव, राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, राष्ट्रीय महामंत्री प्रदीप नागपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. चीनने केलेले आर्थिक आक्रमण परतवून लावण्याची जनतेचीदेखील जबाबदारी आहे. सध्या चीनविरोधात जे वातावरण निर्माण झाले आहे, ते सरकारसाठीदेखील साहाय्यकारक आहे. मात्र चीनला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर अगोदर तेथील नेते व नागरिकांची मानसकिता, संस्कृती, मनोविज्ञान इत्यादींचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. पोखरण स्फोटांनंतर अमेरिकेने भारताचा अभ्यास करण्यासाठी विशेष संस्था स्थापन केली होती. त्याच धर्तीवर भारतानेदेखील ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर चायनीज स्टडीज्’ सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. राममंदिराच्या मुद्यावर गोविंदाचार्य यांनी भाष्य केले. राममंदिर बनावे ही देशातील जनतेची भावना आहे व तो श्रद्धेशी जुळलेला विषय आहे. याबाबत संवाद, कायदा यांचा आधार घेऊन केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. गोहत्याबंदी व राममंदिर या मुद्यांवर सरकार सत्तेत आले. आता जनादेशाचा कौल लक्षात घेत यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचीदेखील तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.केंद्राबाबत सावध भुमिका... एकेकाळी भाजपात असलेल्या गोविंदाचार्य यांनी नोटाबंदीनंतर केंद्र शासनावर टीकेची तोफ डागली होती. मात्र चीनच्या मुद्यावर त्यांनी सावध पवित्रा घेतला. डोकलाम मुद्यावर केंद्र शासनाची भूमिका संतुलित आहे असे ते म्हणाले. नोटाबंदीच्या वेळी केंद्राची योग्य तयारी नव्हती. मात्र जीएसटीसंदर्भात एक ठोस भूमिका रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.