शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

विनाकारण अटक केलेल्यांना ११ लाखांची भरपाई द्या, पीडितांची लेखी माफी मागा- हायकोर्ट

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 12, 2024 11:14 IST

न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी जिल्हाधिकारी आणि कंपनी अवसायक यांना दिले आदेश

राकेश घानोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सक्षम अधिकाऱ्यांनी बेजबाबदार वृत्तीने काम केल्यास निर्दोष व्यक्तींवर किती वाईट परिस्थिती ओढवू शकते, हे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील एका प्रकरणामुळे दिसून आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व ग्ली इंडिया रियल इस्टेट ॲण्ड फायनान्स कंपनीचे अवसायक यांच्या बेजबाबदारपणामुळे पोलिसांनी ११ निष्पाप व्यक्तींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यात वयोवृद्ध महिला व पुरुषांचा समावेश होता. परिणामी, न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी ही बाब अतिशय गंभीरतेने घेऊन सर्व पीडित व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये भरपाई अदा करा, असा आदेश जिल्हाधिकारी व कंपनी अवसायक यांना दिला.

पीडित व्यक्तींमध्ये शांतीदेवी नारायण आसोफा, सुनील रत्नाकर भोयर, अनिल रत्नाकर भोयर, संजय रत्नाकर भोयर, दमयंती रत्नाकर भोयर, हर्षद माधव मानमपल्लीवार, पुष्पा माधव मानमपल्लीवार, वासुदेव रामजी वानकर, बंडू कवडू चोपडे, लक्ष्मी नागा यल्लया कोमू व मालनबाई मनोहर कासवटे यांचा समावेश आहे. अवैध अटक कारवाईमुळे झालेली पिडा लक्षात घेता, न्यायालयाने या सर्वांची माफी मागितली व यासाठी शब्दही अपुरे पडत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच अटक कारवाईमुळे झालेल्या अवमान व मन:स्तापासाठी केवळ माफी मागणे पुरेसे ठरणार नाही, असे स्पष्ट करून आर्थिक नुकसानभरपाईचा आदेश दिला. भरपाईची रक्कम जिल्हाधिकारी व कंपनी अवसायक यांनी अर्धी-अर्धी अदा करायची आहे. त्यासाठी त्यांना ३० ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला. 

याशिवाय, न्यायालयाने नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी पीडित व्यक्तींची लेखी माफी मागावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ३० ऑगस्टपर्यंत अहवाल द्यावा, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना न्यायालयाने भरपाईची रक्कम त्यांच्या वेतनातून का वसूल केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीसही बजावली व यावर ३० ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण मागितले.

 

 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयArrestअटक