शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

विम्याच्या दोन लाख रुपयावर नऊ टक्के व्याज द्या : नागपूरच्या अतिरिक्त ग्राहक मंचचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 22:26 IST

तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देओरिएन्टल इन्शुरन्सविरुद्धची तक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.लक्ष्मी मानवटकर असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या केराडी, ता. पारशिवानी येथील रहिवासी आहेत. मंचच्या ग्राहक विधी सेवा निधीमध्ये ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार रुपये तक्रारकर्तीला द्यायचे आहेत. तसेच, तक्रारकर्तीला तक्रार खर्चाकरिता ५ हजार व शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ५ हजार रुपये ओरिएन्टल इन्शुरन्सने तर, १० हजार रुपये जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनीने द्यायचे आहेत. या निर्णयाचे पालन करण्यासाठी या कंपन्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर देय रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.तक्रारीतील माहितीनुसार, लक्ष्मी मानवटकर यांचे पती अशोक शेतकरी होते. शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. अशोक यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत दोन लाख रुपयाचा विमा काढण्यात आला होता. २७ एप्रिल २०१७ रोजी अशोक यांचा अपघातात झाला. त्यामुळे त्यांचा १८ जून रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मी यांनी विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. परंतु, कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्यांचा दावा नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर प्रतिवादी कंपन्यांनी लेखी उत्तर दाखल करून आपापली बाजू मांडली. तसेच, तक्रार खारीज करण्याची विनंती केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. ओरिएन्टल इन्शुरन्सने ही तक्रार प्रलंबित असतानाच तक्रारकर्तीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले होते. त्यामुळे त्या रकमेवर केवळ व्याज देण्याचा आदेश देण्यात आला.यंत्रणा अकार्यक्षमया प्रकरणात मागणी केलेली सर्व कागदपत्रे तक्रारकर्तीने सादर करूनही विमा दावा अयोग्यपणे फेटाळल्याचे दिसते. ही राज्य सरकारची अतिशय चांगली विमा योजना आहे. परंतु, अकार्यक्षम यंत्रणेमुळे या योजनेचा लाभ पीडितांपर्यंत योग्यप्रकारे पोहचत नाही. या प्रकरणात यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केला असता तर, तक्रारकर्तीला मंचमध्ये तक्रार दाखल करण्याची गरज पडली नसती असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे