शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विम्याच्या दोन लाख रुपयावर नऊ टक्के व्याज द्या : नागपूरच्या अतिरिक्त ग्राहक मंचचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 22:26 IST

तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देओरिएन्टल इन्शुरन्सविरुद्धची तक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.लक्ष्मी मानवटकर असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या केराडी, ता. पारशिवानी येथील रहिवासी आहेत. मंचच्या ग्राहक विधी सेवा निधीमध्ये ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार रुपये तक्रारकर्तीला द्यायचे आहेत. तसेच, तक्रारकर्तीला तक्रार खर्चाकरिता ५ हजार व शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ५ हजार रुपये ओरिएन्टल इन्शुरन्सने तर, १० हजार रुपये जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनीने द्यायचे आहेत. या निर्णयाचे पालन करण्यासाठी या कंपन्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर देय रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.तक्रारीतील माहितीनुसार, लक्ष्मी मानवटकर यांचे पती अशोक शेतकरी होते. शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. अशोक यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत दोन लाख रुपयाचा विमा काढण्यात आला होता. २७ एप्रिल २०१७ रोजी अशोक यांचा अपघातात झाला. त्यामुळे त्यांचा १८ जून रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मी यांनी विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. परंतु, कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्यांचा दावा नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर प्रतिवादी कंपन्यांनी लेखी उत्तर दाखल करून आपापली बाजू मांडली. तसेच, तक्रार खारीज करण्याची विनंती केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. ओरिएन्टल इन्शुरन्सने ही तक्रार प्रलंबित असतानाच तक्रारकर्तीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले होते. त्यामुळे त्या रकमेवर केवळ व्याज देण्याचा आदेश देण्यात आला.यंत्रणा अकार्यक्षमया प्रकरणात मागणी केलेली सर्व कागदपत्रे तक्रारकर्तीने सादर करूनही विमा दावा अयोग्यपणे फेटाळल्याचे दिसते. ही राज्य सरकारची अतिशय चांगली विमा योजना आहे. परंतु, अकार्यक्षम यंत्रणेमुळे या योजनेचा लाभ पीडितांपर्यंत योग्यप्रकारे पोहचत नाही. या प्रकरणात यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केला असता तर, तक्रारकर्तीला मंचमध्ये तक्रार दाखल करण्याची गरज पडली नसती असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे