शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

दुर्मीळ आजारावरील उपचारापासून रुग्ण अद्यापही दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:14 AM

आशिष अग्रवाल नागपूर : आरोग्य क्षेत्राप्रति सरकारची उदासीनता असल्यामुळे आजही देशातील शेकडो मुले दुर्मीळ आजारांवरील योग्य उपचारापासून दूर आहेत. ...

आशिष अग्रवाल

नागपूर : आरोग्य क्षेत्राप्रति सरकारची उदासीनता असल्यामुळे आजही देशातील शेकडो मुले दुर्मीळ आजारांवरील योग्य उपचारापासून दूर आहेत. केंद्र सरकारने नुकतेच दुर्मीळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. लवकरच ते लागूही होणार आहे, परंतु त्यात आवश्यक बदल केल्यावरच ते गरीब कुटुंबासाठी फायद्याचे ठरेल.

देशात ७,००० पेक्षा जास्त दुर्मीळ आजाराची नोंद आहे. यात केवळ १२ ते १५ प्रकारच्या दुर्मीळ आजारावर उपचारांची सोय आहे. दुर्मीळ आजाराचे लवकर निदान होत नाही. यामुळे उपचारालाही उशीर होता. विशेष म्हणजे, या आजाराचे निदान करण्यासाठी अनुभव विशेषज्ञाची गरज असते, परंतु देशात विशेषज्ञांची संख्या कमी असल्याने याचा फटका रुग्णांना बसतो. देशात दुर्मीळ आजारांचे किती रुग्ण आहेत, याची नेमकी संख्या नाही. एका अंदाजानुसार, भारतात ७ लाखांपेक्षा जास्त लोक दुर्मीळ आजाराने पीडित आहेत. यातील काही आजारांवर उपचार आहेत किंवा ते खूप खर्चिक आहेत. ‘आर्गनायजेशन फॉर रेअर डीजिस इंडिया’चे (ओआरडीआई) सहसंस्थापक प्रसन्ना शिरोळेनुसार काही दुर्लभ आजारांवरील खर्च हा लाखांपासून ते कोटींपर्यंत आहे. आनुवंशिक आजार असल्याने याला विमा सुरक्षेचे कवचही नाही. या विषयीचे राष्ट्रीय धोरण २०१७ मध्ये लागू करण्यात आले होते, परंतु नंतर ते अयशस्वी ठरले. आता पुन्हा नवीन धोरण सरकारने तयार केले आहे. हे धोरण तीन भागांत वाटले आहे. पहिला भाग बीपीएल वर्गासाठी आहे. यात समाविष्ट कुटुंबासाठी १५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे, परंतु रोगाच्या निदानासाठी येणारा खर्चच एवढा मोठा राहतो की, गरीब कुटुंबे चाचणीच करीत नाही. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-वेळेत निदान आवश्यक

डॉ.विनित वानखेडे म्हणाले, दुर्मीळ आजारांवरील योग्य उपचारासाठी वेळेत निदान होणे आवश्यक आहे. काही आजारांचे नमुने चेन्नईत पाठविले जातात. याचा अहवाल येण्यास साधारण चार आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो, शिवाय तपासणीचा खर्चही मोठा असतो. ‘स्पायनल मस्कुलर एट्रोफी’ (एसएमए) दुर्मीळ आजार आहे. यावरील एका डोसची किंमत १६ कोटी रुपये आहे. उपचारासाठी २० डोसची गरज पडते. भविष्यात उपचाराचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे.