शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

By नरेश डोंगरे | Updated: April 28, 2024 16:43 IST

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत.

नागपूर : रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची माहिती पुढे आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला प्रचंड हादरा बसला आहे.

संबंधित सूत्राच्या माहितीनुसार, यशवंतपुर एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जन आहार स्टॉल मधून अंडा बिर्याणीचे शंभर पार्सल मागविन्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉल वर त्यातील काही उतरविण्यात आले होते. मागणीप्रमाणे बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे अंडा बिर्याणी वेगवेगळ्या प्रवाशांना देण्यात आली. न इटारसी जवळ ही गाडी पोहोचल्यानंतर अंडा बिर्याणी खाणाऱ्या प्रवाशांना पोटदुखी, मळमळ ओकाऱ्याचा त्रास सुरू झाला.

प्रवासी वेगवेगळ्या आसनावर, वेगवेगळ्या डब्यात असल्याने प्रारंभी या घटनेचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र, इटारसी स्टेशन सोडल्यानंतर विविध डब्यातून एक सारखा त्रास होऊ लागल्याने प्रवासी अस्वस्थ झाले. ही माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक गाडीत चढले आणि प्रवाशांचा उपचार सुरू झाला. काही प्रवाशांना फूड पॉईजनचे गंभीर लक्षण दिसू लागल्याने त्यांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या सर्व वरिष्ठांना कळविले.

नागपूरच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल नेमके कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरू झाले त्याची चौकशी सुरू केली.. त्यानंतर १०० ते २०० प्लेट अंडा बिर्याणी पार्सलचा पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून झाल्याचे आणि नागपूर रेल्वे स्थानकावरूनही जन आहार स्टॉल वरून बरेचसे पाकीट रेल्वे गाड्यात चढविण्यात आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पार्सल विकणाऱ्या येथील जन आहार चा स्टॉल सिल केला.

सॅम्पल जप्त, तपासणीसाठी लॅबमध्ये 

या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून नागपूर तसेच बल्लारशाह या दोन्ही केंद्रावरील विविध खाद्यपदार्थाचे सॅम्पल जप्त करण्यात आले. ते लॅब मध्ये टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल मिळणार आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमाशी बोलताना दिली. 

टॅग्स :nagpurनागपूरfood poisoningअन्नातून विषबाधाrailwayरेल्वे