शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

By नरेश डोंगरे | Updated: April 28, 2024 16:43 IST

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत.

नागपूर : रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची माहिती पुढे आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला प्रचंड हादरा बसला आहे.

संबंधित सूत्राच्या माहितीनुसार, यशवंतपुर एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जन आहार स्टॉल मधून अंडा बिर्याणीचे शंभर पार्सल मागविन्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉल वर त्यातील काही उतरविण्यात आले होते. मागणीप्रमाणे बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे अंडा बिर्याणी वेगवेगळ्या प्रवाशांना देण्यात आली. न इटारसी जवळ ही गाडी पोहोचल्यानंतर अंडा बिर्याणी खाणाऱ्या प्रवाशांना पोटदुखी, मळमळ ओकाऱ्याचा त्रास सुरू झाला.

प्रवासी वेगवेगळ्या आसनावर, वेगवेगळ्या डब्यात असल्याने प्रारंभी या घटनेचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र, इटारसी स्टेशन सोडल्यानंतर विविध डब्यातून एक सारखा त्रास होऊ लागल्याने प्रवासी अस्वस्थ झाले. ही माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक गाडीत चढले आणि प्रवाशांचा उपचार सुरू झाला. काही प्रवाशांना फूड पॉईजनचे गंभीर लक्षण दिसू लागल्याने त्यांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या सर्व वरिष्ठांना कळविले.

नागपूरच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल नेमके कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरू झाले त्याची चौकशी सुरू केली.. त्यानंतर १०० ते २०० प्लेट अंडा बिर्याणी पार्सलचा पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून झाल्याचे आणि नागपूर रेल्वे स्थानकावरूनही जन आहार स्टॉल वरून बरेचसे पाकीट रेल्वे गाड्यात चढविण्यात आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पार्सल विकणाऱ्या येथील जन आहार चा स्टॉल सिल केला.

सॅम्पल जप्त, तपासणीसाठी लॅबमध्ये 

या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून नागपूर तसेच बल्लारशाह या दोन्ही केंद्रावरील विविध खाद्यपदार्थाचे सॅम्पल जप्त करण्यात आले. ते लॅब मध्ये टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल मिळणार आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमाशी बोलताना दिली. 

टॅग्स :nagpurनागपूरfood poisoningअन्नातून विषबाधाrailwayरेल्वे