शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आदिवासी मुलांचा पालकांसह आयुक्तालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:38 IST

विदर्भातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रवेशासाठी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन होते. आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शिक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेत अर्ज केलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेच्या पहिल्या दिवशीही निश्चित झाले नसल्याने, काही पालकांनी मंगळवारी प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिला.

ठळक मुद्देप्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रवेशासाठी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन होते. आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शिक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेत अर्ज केलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेच्या पहिल्या दिवशीही निश्चित झाले नसल्याने, काही पालकांनी मंगळवारी प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिला.दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागातर्फे त्यांचे प्रवेश शहरातील शाळांमध्ये करण्यात येतात. यासाठी शासनातर्फे ५० ते ७० हजार रुपये प्रती विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात येतो. यात विद्यार्थ्यांना शिक्षण, राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. पूर्वी योजनेत १ ते ५ वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. यावर्षी योजनेचा लाभ पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार होता. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. नागपूर प्रकल्प कार्यालयांतर्गत २३६ पालकांनी अर्ज सादर केले होते. पालकांकडून विभागाकडे वारंवार विचारणा करण्यात येत होती. परंतु विभागाकडून प्रवेशासंदर्भात कुठलाही दुजोरा मिळत नसल्याने, मंगळवारी आदिवासी विकास परिषदेने अर्ज केलेल्या पालकांना व विद्यार्थ्याना घेऊन आदिवासी कार्यालयात ठिय्या दिला. फेब्रुवारी महिन्यात पालकांनी अर्ज केल्यानंतरही विभागातर्फे अद्यापही नामांकित शाळेची निवड करण्यात आलेली नसल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली. आजपासून शाळेला सुरुवात झाली असताना, नामांकित शिक्षण योजनेत अद्यापही शाळाच निवडल्या नसल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर योजनेत किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे, यासंदर्भातही निश्चित आकडेवारी विभागाकडे आलेली नाही.ही निवड प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून होते. परंतु प्रशासनाच्या कर्तव्यशून्यतेमुळे दरवर्षी विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपासून शाळा सुरू झाल्या असून, विभागाने अद्यापही शाळांची निवड केली नाही.दिनेश शेराम, अध्यक्ष आदिवासी विकास परिषद

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर