शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

नागपुरात आदिवासी मुलांचा पालकांसह आयुक्तालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:38 IST

विदर्भातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रवेशासाठी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन होते. आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शिक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेत अर्ज केलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेच्या पहिल्या दिवशीही निश्चित झाले नसल्याने, काही पालकांनी मंगळवारी प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिला.

ठळक मुद्देप्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विद्यार्थी व त्यांचे पालक प्रवेशासाठी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या देऊन होते. आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शिक्षण योजना राबविण्यात येते. या योजनेत अर्ज केलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेच्या पहिल्या दिवशीही निश्चित झाले नसल्याने, काही पालकांनी मंगळवारी प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिला.दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागातर्फे त्यांचे प्रवेश शहरातील शाळांमध्ये करण्यात येतात. यासाठी शासनातर्फे ५० ते ७० हजार रुपये प्रती विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात येतो. यात विद्यार्थ्यांना शिक्षण, राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. पूर्वी योजनेत १ ते ५ वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. यावर्षी योजनेचा लाभ पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार होता. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. नागपूर प्रकल्प कार्यालयांतर्गत २३६ पालकांनी अर्ज सादर केले होते. पालकांकडून विभागाकडे वारंवार विचारणा करण्यात येत होती. परंतु विभागाकडून प्रवेशासंदर्भात कुठलाही दुजोरा मिळत नसल्याने, मंगळवारी आदिवासी विकास परिषदेने अर्ज केलेल्या पालकांना व विद्यार्थ्याना घेऊन आदिवासी कार्यालयात ठिय्या दिला. फेब्रुवारी महिन्यात पालकांनी अर्ज केल्यानंतरही विभागातर्फे अद्यापही नामांकित शाळेची निवड करण्यात आलेली नसल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली. आजपासून शाळेला सुरुवात झाली असताना, नामांकित शिक्षण योजनेत अद्यापही शाळाच निवडल्या नसल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर योजनेत किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे, यासंदर्भातही निश्चित आकडेवारी विभागाकडे आलेली नाही.ही निवड प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून होते. परंतु प्रशासनाच्या कर्तव्यशून्यतेमुळे दरवर्षी विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपासून शाळा सुरू झाल्या असून, विभागाने अद्यापही शाळांची निवड केली नाही.दिनेश शेराम, अध्यक्ष आदिवासी विकास परिषद

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर