शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान; उज्ज्वल निकम यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:29 IST

पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनमंच जनगौरव व जनसेवक पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून दहशतवाद्यांविरुद्ध खटले चालविले आहेत.अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते रविवारी सेवानिवृत्त प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जनमंच जनगौरव पुरस्कार तर, सरकारी अधिकारी अजय लहाने यांना जनमंच जनसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. उपलेंचवार यांनी ‘विद्यार्थी सहायक समिती’च्या माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे. लहाने कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. हे पुरस्कार जनमंच या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी दिले जातात. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलस्थित साई सभागृहात पार पडला.निकम यांनी पाकिस्तानवर थेट नेम साधला. भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट पाकिस्तानमध्ये शिजले होते. त्याचे पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत नाही. भारताला आवश्यक सहकार्य देत नाही. पाकिस्तान हा भारताकरिता अतिशय धोकादायक देश आहे. त्यामुळे भारतीयांनी सतत सावधान राहून देशातील शांतता कायम ठेवली पाहिजे. वर्तमान काळात सोशल मीडियाचा सर्वाधिक गैरवापर होत आहे. डोकी भडकवणारे संदेश पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सत्य जाणूनच पुढील कृती केली पाहिजे. आजच्या परिस्थितीत तरुणांमध्ये देशप्रेमाचे बीज पेरणे आवश्यक झाले आहे असे निकम यांनी सांगितले.शिक्षणामुळे लोक सुशिक्षित होतात. त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी चांगल्या विचारांचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. चांगले काम करणाऱ्याच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. त्याविरुद्ध लढण्याची शक्ती आत्मविश्वासातून प्राप्त होते. संकटे आल्यानंतर कधीच निरुत्साही होऊ नका. मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. संकटांवर मात करूनच यशाची शिखरे गाठता येतात. चांगले काम करताना प्रामाणिकपणाचा दुर्गुण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मतही निकम यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी संचालन, जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी प्रास्ताविक तर, महासचिव नरेश क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले.

‘प्रकाशवाट’च्या शिक्षकांचा गौरवजनमंचचा ‘प्रकाशवाट’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राबत असलेले शिक्षक अली, टाले, बांबल, सावरकर व देवके यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. इयत्ता नववीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची तयारी करून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण विदर्भात तालुकास्तरावर राबविला जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी अली, टाले, बांबल, सावरकर व देवके या शिक्षकांनी तालुक्यातील ३७ गावे फिरून १०५ विद्यार्थी गोळा केले आहेत.

मी जनमंचचा अ‍ॅम्बेसडरअ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ते कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता जनमंचचे अ‍ॅम्बेसडर होण्यास तयार असल्याची घोषणा केली. जनमंच अतिशय उत्तम कार्य करीत असून या संस्थेमुळे राज्यातील अनेक प्रश्न सुटले आहेत. या संस्थेचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातून प्रेरणा मिळून राज्यात चळवळ उभी राहील. खटल्यांच्या निमित्ताने राज्यभर फिरत असतो. यादरम्यान जनमंचचा अ‍ॅम्बेसडर म्हणून कार्य करण्यास आपली तयारी आहे असे त्यांनी सांगितले.

शिक्षक-विद्यार्थ्यांत जिव्हाळा असावाविद्यार्थ्यांशिवाय माझ्या व माझ्याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. विद्यार्थी शिक्षकपरायण, शिक्षक विद्यार्थीपरायण, दोघेही ज्ञानपरायण व ज्ञान सेवापरायण असायला हवे. तसेच, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे नाते असावे.- प्रा. मधुकर उपलेंचवार

सार्वजनिक पैशांची उधळपट्टी नकोसरकारी अधिकाऱ्यांने विकासकामे करताना सार्वजनिक निधीची उधळपट्टी करू नये. निधी वाचवणे म्हणजे निधी गोळा करणे होय. सरकारी अधिकाऱ्यांची सध्याची अवस्था वाईट आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थेशी भांडावे लागते.- अजय लहाने

दोन्ही सत्कारमूर्ती सज्जनशक्तीचे प्रतीकमधुकर उपलेंचवार व अजय लहाने हे दोन्ही सत्कारमूर्ती सज्जनशक्तीचे प्रतीक आहेत. दोघेही हिशेबी व्यक्ती नाहीत. त्यांनी स्वत:ला समाजाकरिता अर्पण केले आहे. स्वत: चांगले आयुष्य जगायचे सोडून ते वंचितांना आधार देण्यासाठी लढत आहेत.- प्रा. शरद पाटील

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम