नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नागपूर महानगरपालिकेतर्फे दर महिन्याला नियमितपणे सभेचे आयोजन करण्यात येते व जनप्रतिनिधी या नात्याने त्याला नगरसेवकांनी उपस्थित असावे, असे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षभरात मनपाच्या सभेदरम्यान सरासरी १५ नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या काल ...
घटनेच्या वेळी आरोपी केवळ १९ वर्षांचा होता. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला आहे. आरोपीने आता लग्न केले आहे. त्यामुळे शिक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने य ...
दारूच्या नशेत टुन्न असलेल्या दोघांनी लोकमत टाइम्सचे सहायक संपादक आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. वेळीच काही पत्रकार आणि पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचल्याने त्रिपाठी बचावले. हल्ला करणाऱ्यांमध ...
राज्याची उपराजधानी असलेले नाागपूर हे समरसता नांदणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागासवर्गीय महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी पाहता नागपूरची मान लाजेने खाली घालण्याची वेळ आली आहे. अनुसूचित जातीच्या माहिलांवरील अत्याचाराच्या घटनेत नागपूर आघाडीवर आहे. ...
महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर व परळी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना जलदगतीने व पुरेशा प्रमाणात कोळसा पुरवता यावा म्हणून कटघोरा व डोंगरगड हा नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहे. ...
कॉंग्रेस पक्षाने उपोषण केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षातर्फेदेखील उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे. दिल्लीप्रमाणेच नागपुरातदेखील सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात हे उपोषण राहणार आहे. गुरुवारी ...
१४ व १५ एप्रिल रोजी दीक्षाभूमीच्या सभागृहात एकत्रितपणे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत विमलकित्ती गुणसिरी, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी संयुक्त जयंतीच्या आयोजनाबाबत मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना शिक्षेसाठीच पात्र ठरवून त्यांची २० वर्षांचा सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना व ...
राज्य शासनाला अनेक वर्षांपासून १०० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल देणारे नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चक्क गोदामात सुरू आहे. सोयींचा अभाव व अल्प मनुष्यबळ असतानाही दिलेल्या लक्ष्याच्यावर जाऊन म्हणजे ११७ टक्के लक्ष्य (टार्गेट) गाठले. श ...
सर्वोच्च न्यायालयाने या देशातील तुरुंगांमधील प्रचंड वाढत्या गर्दीबद्दल सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना फटकारल्याने तुरुंगांमधील दैनावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ...