मानेवाडा रोडवरील लाडीकर ले-आऊ ट येथील दोन मजली आलिशान श्रीराम सेलिब्रेशन हॉलचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हॉलच्या अवैध पार्किंगमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिका व नासुप्रकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत नासु ...
सुलभ शौचालयात दारू पिण्यास मनाई केली म्हणून तेथील कर्मचाऱ्याची दोन आरोपींनी निर्घृण हत्या केली. राजेश ऊर्फ रज्जू रामनारायण यादव (वय ३८) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या रामनगर चौकाजवळ गुरुवारी भरदुपारी ही थरारक घटना घडली. ...
मेयोच्या वाढीव एमबीबीएसच्या ५० जागांसाठी उपलब्ध सोयींची तपासणी करतेवेळी ‘एमसीआय’ चमूने यंत्रसामुग्री व अल्प मनुष्यबळासह एकूण १३ त्रुटी काढल्या. परिणामी, वाढीव जागा धोक्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी व संचालकांनी त्रुटी दूर करण् ...
एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जात ...
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमांतर्गतच्या खटल्यांतही उच्च न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ मधील अमर्याद अधिकारांचा वापर करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी देण्यात आला. ...
स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळा ...
राज्यभरातील २७ हजार डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांमधून केवळ ४,३८४ जणांनी बायोमेट्रिकशी आधार संलग्न केले आहे. धक्कादायक म्हणजे त्यातही केवळ १४३ जणच बायोमेट्रिकचा वापर करीत असल्याने आधार संलग्न बायोमेट्रिकला राज्यभरातून ‘ठेंगा’ दाखविला जात असल्याचे चित्र आहे. ...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १२ मार्च या जयंतीदिनाला पुरस्कार वितरण सोहळा साजरा होतो. परंतु यावर्षी यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची अद्यापही घोषणा झालेली नाही. ...
राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत राज्यातील १९२ गावांतील सुमारे ८८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून यात विदर्भातील १४० गावात ५१७० वीज जोडण्या देऊन निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात ...
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी जात असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करीत या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक ...