कोरोनाचा फैलाव होण्याच्या कारणामुळे महानगरपालिकेने कुलर वापरण्यावर बंदी आणल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी आपापल्या घरचे कुलर काढले आहेत. ...
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे जगात आर्थिक मंदी असून लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आणि नंतर सरकारच्या नवीन तरतुदींचे पालन करून नव्याने काम सुरू करणे हे चार्टर्ड अकाऊंटंटसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...
विहीरगाव येथील उत्पादक शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, कळमन्यात एक दिवसाआड भाज्या विक्रीसाठी नेत होतो. पण ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार बंद झाला आणि आम्हाला फटका बसला. ...
स्वत:चे घर नसल्याने अडचणीत सापडलेल्या लोकांना नागपूर महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे. यात सर्वाधिक ६८८ लोक मध्य प्रदेशातील आहेत. ...
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे. ...
कोरोनाच्या काळात ‘फ्रंटलाइनवर’ काम करणाऱ्या डॉक्टरांवर देश•ारात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्व•ाूमीवर २२ एप्रिल रोजी 'व्हाईट अलर्ट' तर २३ एप्रिल रोजी ‘ब्लॅक अलर्ट’ पाळला जाणार आहे. ...
मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली. ...
एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबु ...
लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता. ...
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये लाखोच्या संख्येतील गरजूंपर्यंत बीएपीएस स्वामिनारायण संस्था पोहोचली आहे. नागपुरात या संस्थेकडून आतापर्यंत अडीच लाख लोकांना मदत पुरविण्यात आली असून, देशभरात ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत ही संस्था पोह ...