शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

४६ गटांकडून होतेय २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या ...

ठळक मुद्देउत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री : शेतकऱ्यांची क्रयशक्तीही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेती कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात २०१५-१६ पासून राबविण्यात आला आहे. यात ४६ बचत गटांकडून जिल्ह्यात २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती होत आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला भरपूर मागणी असून, सध्यातरी उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे अधिकचे श्रम असले तरी, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली आहे.अ‍ॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (आत्मा)च्या माध्यमातून सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ५० शेतकऱ्यांचा एक गट असे ४६ गट ११ तालुक्यांमध्ये सेंद्रिय शेती करीत आहेत. जवळपास २३०० एकरवर हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ज्या गटांची निवड झाली आहे, त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे संकल्पपत्र भरून घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गटाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे अभ्यासदौरे काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतावर सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, गांडूळ खत, औषध तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे.सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढली आहे. शिवाय उत्पादनातही वाढ झाली आहे. पिकांवर होणाऱ्या किडीचे परिणाम दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांच्या विक्रीसाठी शेतकºयांना भटकावेही लागत नाही. सेंद्रिय पिकांचा ब्रॅण्डआत्माने सेंद्रिय उत्पादनाचा (एनओएफपीएस) या नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. प्रत्येक बचत गटांचे पीजीएस इंडिया वर आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. त्याचे सर्टिफिकेट सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय उत्पादित मालाची ‘एनएबीएल’ अ‍ॅक्रिडेटेड लॅबमध्ये पेस्टीसाईडची तपासणी सुद्धा होत आहे. २० गटांचा नवीन प्रस्ताव पाठविला आहेया कार्यक्रमात सुरुवातीला भरपूर त्रास झाला. पण शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद यामुळे आता शेतकरी वाढत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी एक एकर शेती या प्रकल्पात दिली होती. ते आता पाच एकर शेती या कार्यक्रमासाठी देत आहे. सेंद्रिय शेतीला शेतकऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेता आणखी शेतकऱ्यांचे गट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयार झाले आहेत. अशा २० गटांचे प्रस्ताव आम्ही पाठविले आहे.डॉ. नलिनी भोयर, प्रकल्प संचालक, आत्मा

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर