शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

४६ गटांकडून होतेय २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या ...

ठळक मुद्देउत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री : शेतकऱ्यांची क्रयशक्तीही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेती कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात २०१५-१६ पासून राबविण्यात आला आहे. यात ४६ बचत गटांकडून जिल्ह्यात २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती होत आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला भरपूर मागणी असून, सध्यातरी उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे अधिकचे श्रम असले तरी, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली आहे.अ‍ॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (आत्मा)च्या माध्यमातून सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ५० शेतकऱ्यांचा एक गट असे ४६ गट ११ तालुक्यांमध्ये सेंद्रिय शेती करीत आहेत. जवळपास २३०० एकरवर हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ज्या गटांची निवड झाली आहे, त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे संकल्पपत्र भरून घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गटाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे अभ्यासदौरे काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतावर सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, गांडूळ खत, औषध तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे.सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढली आहे. शिवाय उत्पादनातही वाढ झाली आहे. पिकांवर होणाऱ्या किडीचे परिणाम दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांच्या विक्रीसाठी शेतकºयांना भटकावेही लागत नाही. सेंद्रिय पिकांचा ब्रॅण्डआत्माने सेंद्रिय उत्पादनाचा (एनओएफपीएस) या नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. प्रत्येक बचत गटांचे पीजीएस इंडिया वर आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. त्याचे सर्टिफिकेट सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय उत्पादित मालाची ‘एनएबीएल’ अ‍ॅक्रिडेटेड लॅबमध्ये पेस्टीसाईडची तपासणी सुद्धा होत आहे. २० गटांचा नवीन प्रस्ताव पाठविला आहेया कार्यक्रमात सुरुवातीला भरपूर त्रास झाला. पण शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद यामुळे आता शेतकरी वाढत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी एक एकर शेती या प्रकल्पात दिली होती. ते आता पाच एकर शेती या कार्यक्रमासाठी देत आहे. सेंद्रिय शेतीला शेतकऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेता आणखी शेतकऱ्यांचे गट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयार झाले आहेत. अशा २० गटांचे प्रस्ताव आम्ही पाठविले आहे.डॉ. नलिनी भोयर, प्रकल्प संचालक, आत्मा

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर