शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

४६ गटांकडून होतेय २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या ...

ठळक मुद्देउत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री : शेतकऱ्यांची क्रयशक्तीही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीचे आणि मानवाचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून सेंद्रीय शेतीला शासनाने प्रोत्साहन दिले आहे. शासनाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रिय शेती कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात २०१५-१६ पासून राबविण्यात आला आहे. यात ४६ बचत गटांकडून जिल्ह्यात २३०० एकरमध्ये सेंद्रिय शेती होत आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला भरपूर मागणी असून, सध्यातरी उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे अधिकचे श्रम असले तरी, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली आहे.अ‍ॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी (आत्मा)च्या माध्यमातून सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ५० शेतकऱ्यांचा एक गट असे ४६ गट ११ तालुक्यांमध्ये सेंद्रिय शेती करीत आहेत. जवळपास २३०० एकरवर हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ज्या गटांची निवड झाली आहे, त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे संकल्पपत्र भरून घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गटाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे अभ्यासदौरे काढण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतावर सेंद्रिय निविष्ठा तयार करणे, गांडूळ खत, औषध तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले आहे.सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढली आहे. शिवाय उत्पादनातही वाढ झाली आहे. पिकांवर होणाऱ्या किडीचे परिणाम दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांच्या विक्रीसाठी शेतकºयांना भटकावेही लागत नाही. सेंद्रिय पिकांचा ब्रॅण्डआत्माने सेंद्रिय उत्पादनाचा (एनओएफपीएस) या नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. प्रत्येक बचत गटांचे पीजीएस इंडिया वर आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. त्याचे सर्टिफिकेट सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय उत्पादित मालाची ‘एनएबीएल’ अ‍ॅक्रिडेटेड लॅबमध्ये पेस्टीसाईडची तपासणी सुद्धा होत आहे. २० गटांचा नवीन प्रस्ताव पाठविला आहेया कार्यक्रमात सुरुवातीला भरपूर त्रास झाला. पण शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद यामुळे आता शेतकरी वाढत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी एक एकर शेती या प्रकल्पात दिली होती. ते आता पाच एकर शेती या कार्यक्रमासाठी देत आहे. सेंद्रिय शेतीला शेतकऱ्यांना होत असलेला फायदा लक्षात घेता आणखी शेतकऱ्यांचे गट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयार झाले आहेत. अशा २० गटांचे प्रस्ताव आम्ही पाठविले आहे.डॉ. नलिनी भोयर, प्रकल्प संचालक, आत्मा

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर