शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

मुख्यालय बदलण्याचा आदेश जीवनातील कटू आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:07 IST

नागपूर : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून औरंगाबाद करण्यात ...

नागपूर : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून औरंगाबाद करण्यात आले हाेते. हा प्रसंग जीवनातील फार मोठी कटू आठवण आहे, अशी भावना न्यायमूर्ती हक यांनी गुरुवारी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने आयोजित निरोप समारंभात बोलताना व्यक्त केली.

न्यायमूर्ती हक येत्या १६ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी न्या. हक यांनी बार सदस्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील विविध प्रसंग उलगडले. मुख्यालय बदलण्याचा आदेश जीवनातील कठीण प्रसंग होता. हा आदेश आपल्या इच्छेमुळे काढण्यात आला, असे सुरुवातीला सर्वांना वाटले होते. परंतु, तसे नसल्याचे कळल्यानंतर हायकोर्ट बार ठामपणे पाठीमागे उभा राहिला. तुम्ही खरे असता, तेव्हा हायकोर्ट बार कधीच माघार घेत नाही. हा बार धाडसी असून, त्याचा सदस्य असल्याचा अभिमान आहे, असे न्या. हक यांनी पुढे नमूद करून बारचे आभार मानले. येथे उल्लेखनीय म्हणजे, न्या़ हक यांचे मुख्यालय बदलण्याचा आदेश काही दिवसानंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे ते नागपूरमध्येच कायम राहिले.

वकील व न्यायमूर्ती होण्याचा कधीच विचार केला नव्हता. वडिलांच्या आग्रहामुळे वकील झालाे. सुरुवातीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. त्यानंतर अ‍ॅड. जे़. एन. चांदूरकर यांच्या आग्रहामुळे नागपुरात येऊन वकिली करायला लागलाे. जीवनात आतापर्यंत जे काही केले त्यावर समाधानी आहे. वकील होण्यापासून ते न्यायमूर्तीपदी कार्य करण्यापर्यंतच्या प्रवासाचा मनापासून आनंद घेतला. आता हायकोर्ट बारमध्ये परतणार असून, त्याचाही खूप आनंद आहे, असे न्या. हक यांनी सांगितले. कार्यक्रमात संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमन, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

--------------------

अनेक प्रकरणात दिले महत्त्वपूर्ण निर्णय

न्या. हक यांनी आतापर्यंत अनेक दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिले. अलीकडची काही प्रकरणे पाहिल्यास त्यांनी, नगरसेविका प्रगती पाटील व तिलोत्तमा किनखेडे प्रकरणामध्ये, नगरसेवकाने निवडून येण्यापूर्वी अनधिकृत बांधकाम केले तरी तो अपात्र ठरतो, असा निर्णय दिला. अशोक रेचनकर यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी कृषी पतसंस्थांच्या व्यवस्थापकीय समितीतून व ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडलेल्या एपीएमसी सदस्यांचे एपीएमसी सदस्यपद मूळ संस्थेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संपुष्टात येते, असा निर्णय दिला. फौजदारी प्रकरणांमध्ये त्यांनी अकोला येथील जयराज बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर खून प्रकरणात सात आरोपींना तर, वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील राजकुमार पायेकर खून प्रकरणात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपींना संबंधित सत्र न्यायालयांनी निर्दोष सोडले होते़

-----------------------

जून-२०१३ मध्ये झाले न्यायमूर्ती

न्या़ हक यांची २१ जून २०१३ रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ दोन वर्षानंतर त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले़ १७ मे १९५९ रोजी जन्म झालेले न्या़ हक यांनी प्राथमिक ते विधी पदवीपर्यंतचे शिक्षण अकोला येथे पूर्ण केले़ काही महिने अकोला जिल्हा न्यायालयात वकिली केल्यानंतर डिसेंबर-१९८५ मध्ये ते नागपूरला आले़ उच्च न्यायालयात वकिली करताना त्यांनी अनेक पीडित पक्षकारांना न्याय मिळवून दिला़