शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालय बदलण्याचा आदेश जीवनातील कटू आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:07 IST

नागपूर : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून औरंगाबाद करण्यात ...

नागपूर : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून औरंगाबाद करण्यात आले हाेते. हा प्रसंग जीवनातील फार मोठी कटू आठवण आहे, अशी भावना न्यायमूर्ती हक यांनी गुरुवारी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने आयोजित निरोप समारंभात बोलताना व्यक्त केली.

न्यायमूर्ती हक येत्या १६ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी न्या. हक यांनी बार सदस्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील विविध प्रसंग उलगडले. मुख्यालय बदलण्याचा आदेश जीवनातील कठीण प्रसंग होता. हा आदेश आपल्या इच्छेमुळे काढण्यात आला, असे सुरुवातीला सर्वांना वाटले होते. परंतु, तसे नसल्याचे कळल्यानंतर हायकोर्ट बार ठामपणे पाठीमागे उभा राहिला. तुम्ही खरे असता, तेव्हा हायकोर्ट बार कधीच माघार घेत नाही. हा बार धाडसी असून, त्याचा सदस्य असल्याचा अभिमान आहे, असे न्या. हक यांनी पुढे नमूद करून बारचे आभार मानले. येथे उल्लेखनीय म्हणजे, न्या़ हक यांचे मुख्यालय बदलण्याचा आदेश काही दिवसानंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे ते नागपूरमध्येच कायम राहिले.

वकील व न्यायमूर्ती होण्याचा कधीच विचार केला नव्हता. वडिलांच्या आग्रहामुळे वकील झालाे. सुरुवातीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. त्यानंतर अ‍ॅड. जे़. एन. चांदूरकर यांच्या आग्रहामुळे नागपुरात येऊन वकिली करायला लागलाे. जीवनात आतापर्यंत जे काही केले त्यावर समाधानी आहे. वकील होण्यापासून ते न्यायमूर्तीपदी कार्य करण्यापर्यंतच्या प्रवासाचा मनापासून आनंद घेतला. आता हायकोर्ट बारमध्ये परतणार असून, त्याचाही खूप आनंद आहे, असे न्या. हक यांनी सांगितले. कार्यक्रमात संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमन, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

--------------------

अनेक प्रकरणात दिले महत्त्वपूर्ण निर्णय

न्या. हक यांनी आतापर्यंत अनेक दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिले. अलीकडची काही प्रकरणे पाहिल्यास त्यांनी, नगरसेविका प्रगती पाटील व तिलोत्तमा किनखेडे प्रकरणामध्ये, नगरसेवकाने निवडून येण्यापूर्वी अनधिकृत बांधकाम केले तरी तो अपात्र ठरतो, असा निर्णय दिला. अशोक रेचनकर यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी कृषी पतसंस्थांच्या व्यवस्थापकीय समितीतून व ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडलेल्या एपीएमसी सदस्यांचे एपीएमसी सदस्यपद मूळ संस्थेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संपुष्टात येते, असा निर्णय दिला. फौजदारी प्रकरणांमध्ये त्यांनी अकोला येथील जयराज बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर खून प्रकरणात सात आरोपींना तर, वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील राजकुमार पायेकर खून प्रकरणात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपींना संबंधित सत्र न्यायालयांनी निर्दोष सोडले होते़

-----------------------

जून-२०१३ मध्ये झाले न्यायमूर्ती

न्या़ हक यांची २१ जून २०१३ रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ दोन वर्षानंतर त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले़ १७ मे १९५९ रोजी जन्म झालेले न्या़ हक यांनी प्राथमिक ते विधी पदवीपर्यंतचे शिक्षण अकोला येथे पूर्ण केले़ काही महिने अकोला जिल्हा न्यायालयात वकिली केल्यानंतर डिसेंबर-१९८५ मध्ये ते नागपूरला आले़ उच्च न्यायालयात वकिली करताना त्यांनी अनेक पीडित पक्षकारांना न्याय मिळवून दिला़