शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मुख्यालय बदलण्याचा आदेश जीवनातील कटू आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:07 IST

नागपूर : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून औरंगाबाद करण्यात ...

नागपूर : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून औरंगाबाद करण्यात आले हाेते. हा प्रसंग जीवनातील फार मोठी कटू आठवण आहे, अशी भावना न्यायमूर्ती हक यांनी गुरुवारी हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने आयोजित निरोप समारंभात बोलताना व्यक्त केली.

न्यायमूर्ती हक येत्या १६ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी न्या. हक यांनी बार सदस्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील विविध प्रसंग उलगडले. मुख्यालय बदलण्याचा आदेश जीवनातील कठीण प्रसंग होता. हा आदेश आपल्या इच्छेमुळे काढण्यात आला, असे सुरुवातीला सर्वांना वाटले होते. परंतु, तसे नसल्याचे कळल्यानंतर हायकोर्ट बार ठामपणे पाठीमागे उभा राहिला. तुम्ही खरे असता, तेव्हा हायकोर्ट बार कधीच माघार घेत नाही. हा बार धाडसी असून, त्याचा सदस्य असल्याचा अभिमान आहे, असे न्या. हक यांनी पुढे नमूद करून बारचे आभार मानले. येथे उल्लेखनीय म्हणजे, न्या़ हक यांचे मुख्यालय बदलण्याचा आदेश काही दिवसानंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे ते नागपूरमध्येच कायम राहिले.

वकील व न्यायमूर्ती होण्याचा कधीच विचार केला नव्हता. वडिलांच्या आग्रहामुळे वकील झालाे. सुरुवातीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. त्यानंतर अ‍ॅड. जे़. एन. चांदूरकर यांच्या आग्रहामुळे नागपुरात येऊन वकिली करायला लागलाे. जीवनात आतापर्यंत जे काही केले त्यावर समाधानी आहे. वकील होण्यापासून ते न्यायमूर्तीपदी कार्य करण्यापर्यंतच्या प्रवासाचा मनापासून आनंद घेतला. आता हायकोर्ट बारमध्ये परतणार असून, त्याचाही खूप आनंद आहे, असे न्या. हक यांनी सांगितले. कार्यक्रमात संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमन, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

--------------------

अनेक प्रकरणात दिले महत्त्वपूर्ण निर्णय

न्या. हक यांनी आतापर्यंत अनेक दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिले. अलीकडची काही प्रकरणे पाहिल्यास त्यांनी, नगरसेविका प्रगती पाटील व तिलोत्तमा किनखेडे प्रकरणामध्ये, नगरसेवकाने निवडून येण्यापूर्वी अनधिकृत बांधकाम केले तरी तो अपात्र ठरतो, असा निर्णय दिला. अशोक रेचनकर यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी कृषी पतसंस्थांच्या व्यवस्थापकीय समितीतून व ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडलेल्या एपीएमसी सदस्यांचे एपीएमसी सदस्यपद मूळ संस्थेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर संपुष्टात येते, असा निर्णय दिला. फौजदारी प्रकरणांमध्ये त्यांनी अकोला येथील जयराज बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर खून प्रकरणात सात आरोपींना तर, वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील राजकुमार पायेकर खून प्रकरणात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपींना संबंधित सत्र न्यायालयांनी निर्दोष सोडले होते़

-----------------------

जून-२०१३ मध्ये झाले न्यायमूर्ती

न्या़ हक यांची २१ जून २०१३ रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती़ दोन वर्षानंतर त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले़ १७ मे १९५९ रोजी जन्म झालेले न्या़ हक यांनी प्राथमिक ते विधी पदवीपर्यंतचे शिक्षण अकोला येथे पूर्ण केले़ काही महिने अकोला जिल्हा न्यायालयात वकिली केल्यानंतर डिसेंबर-१९८५ मध्ये ते नागपूरला आले़ उच्च न्यायालयात वकिली करताना त्यांनी अनेक पीडित पक्षकारांना न्याय मिळवून दिला़