शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विदर्भातील संत्र्याची चीनला निर्यात करता येणार

By कमलेश वानखेडे | Updated: October 5, 2024 17:00 IST

आशिष देशमुख : काटोल येथे हॉर्टीकल्चर कॉलेज

नागपूर : बांगलादेशमध्ये संत्रा निर्यात करण्याला फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेथील सरकारने अवाजवी आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे आपल्या भागातील संत्रा चीनला जावा या उद्देशाने सकारात्मक प्रस्ताव कृषी विभागाने महाराष्ट्र सरकारला आणि त्यानंतर केंद्र सरकारला पाठवलेला आहे. वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. विदर्भातील संत्रा चीनला जाण्याच्या दृष्टीने देशाच्या प्रोटोकॉलमध्ये चीनचा समावेश व्हावा, यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी दिली.

देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत नुकतेच मुंबई मंत्रालय येथे आयोजित बैठकीत विदर्भातील संत्रा-मोसंबी, कापूस-सोयाबीन प्रश्नांसंबंधात चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय झाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हॉर्टीकल्चर कॉलेज काटोल तालुक्यात सुरू करण्यासाठी कृषी विद्यापीठाने परवानगी दिलीच होती पण महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी सुद्धा परवाच याबाबतीत परवानगी दिली आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याची अनुमती मिळणार आहे.

'वसंतदादा शुगर इंस्टिट्युट' च्या धर्तीवर राज्यात सिट्रस इस्टेट चालु करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली व हा निर्णय लवकरात लवकर अमंलबजावणी करण्याच्या संबंधितांना सुचना देण्यात आल्या. जुलै- ऑगस्टमध्ये संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या संत्रा मोसंबी बागांचे सर्वेक्षण करून हेक्टरी ५० हजार रु आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला मनोज जवंजाळ, महादेव नखाते, अंगद बैसवार, कृष्णा डफरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखVidarbhaविदर्भnagpurनागपूर