शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

वाढत्या तापमानाचा फटका; संत्रा गळतीमुळे विदर्भात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 11:04 IST

नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांकडून भरपाईची मागणी

स्नेहलता श्रीवास्तव

नागपूर : सप्टेंंबर ते डिसेंबर या कालावधीत संत्र्याच्या आंबिया बहार पिकाची यंदा विदर्भातील विविध भागांत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत होते. मागील १०० वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा फटका बसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

या संदर्भात कृषी सहसंचालक रवींद्र भोसले म्हणाले, यावर्षी मार्चमध्ये कमालीचे तापमान वाढले. लोडशेडिंगमुळे मर्यादित सिंचन झाले. त्यामुळे तापमानवाढीबरोबरच फळबागांना फटका बसला.

अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनीही फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाल्याचे मान्य केले आहे. हे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी ३० ते ६० टक्के आहे. विभागाने आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे औपचारिक सर्वेक्षण केलेले नाही.

सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे (सीसीआरआय) संचालक डॉ. दिलीप घोष म्हणाले, हवामानामुळे फळे गळणे सामान्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवत आहोत.

हेटी (ता. काटोल) येथील बाळू मालोदे म्हणाले, त्यांच्याकडे १२.५ एकर संत्रा बाग होती, मात्र ५० ते ६० टक्के फळगळतीमुळे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. दिग्रस येथील शेतकरी प्रमोद तिजारे यांनी ७० टक्के फळगळतीमुळे १५ लाख रुपयांचे तर पुसला (ता. वरुड) गावातील वैभव कंदुलकर आणि डावरगाव येथील सागर चिकटे यांनीही ४० ते ७० टक्के फळांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

अमरावती विभागात संत्रा गळती ५० ते ७० टक्क्यांपर्यंत होती. शासनाने प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षानुवर्षे एवढे मोठे नुकसान शेतकरी सहन करू शकत नाहीत.

- श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज

काही ठिकाणी ३० ते ५० तर काही ठिकाणी ७० ते ८० टक्क्यांपर्यंतचे नुकसान आहे. सरकारने नुकसानीनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये भरपाई द्यावी.

- मनोज जवंजाळ, अध्यक्ष, नागपुरी संत्रा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.

सीसीआरआयच्या शास्त्रज्ञांनी प्रादेशिक हवामान विभागाच्या सहकार्याने नुकसान टाळण्यासाठी संशोधनाद्वारे अशा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत.

- रमेश जिचकार, सीईओ, श्रमजीवी ऑरेंज प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, वरुड

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ