शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

वाढत्या तापमानाचा फटका; संत्रा गळतीमुळे विदर्भात ५०० कोटींचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 11:04 IST

नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांकडून भरपाईची मागणी

स्नेहलता श्रीवास्तव

नागपूर : सप्टेंंबर ते डिसेंबर या कालावधीत संत्र्याच्या आंबिया बहार पिकाची यंदा विदर्भातील विविध भागांत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान ४० ते ४५ अंशांपर्यंत होते. मागील १०० वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा फटका बसल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

नुकसान झाल्यामुळे शेतकरी आणि संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

या संदर्भात कृषी सहसंचालक रवींद्र भोसले म्हणाले, यावर्षी मार्चमध्ये कमालीचे तापमान वाढले. लोडशेडिंगमुळे मर्यादित सिंचन झाले. त्यामुळे तापमानवाढीबरोबरच फळबागांना फटका बसला.

अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे यांनीही फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाल्याचे मान्य केले आहे. हे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी ३० ते ६० टक्के आहे. विभागाने आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे औपचारिक सर्वेक्षण केलेले नाही.

सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे (सीसीआरआय) संचालक डॉ. दिलीप घोष म्हणाले, हवामानामुळे फळे गळणे सामान्य आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवत आहोत.

हेटी (ता. काटोल) येथील बाळू मालोदे म्हणाले, त्यांच्याकडे १२.५ एकर संत्रा बाग होती, मात्र ५० ते ६० टक्के फळगळतीमुळे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले. दिग्रस येथील शेतकरी प्रमोद तिजारे यांनी ७० टक्के फळगळतीमुळे १५ लाख रुपयांचे तर पुसला (ता. वरुड) गावातील वैभव कंदुलकर आणि डावरगाव येथील सागर चिकटे यांनीही ४० ते ७० टक्के फळांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

अमरावती विभागात संत्रा गळती ५० ते ७० टक्क्यांपर्यंत होती. शासनाने प्रत्यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. नैसर्गिक आपत्तींमुळे वर्षानुवर्षे एवढे मोठे नुकसान शेतकरी सहन करू शकत नाहीत.

- श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज

काही ठिकाणी ३० ते ५० तर काही ठिकाणी ७० ते ८० टक्क्यांपर्यंतचे नुकसान आहे. सरकारने नुकसानीनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये भरपाई द्यावी.

- मनोज जवंजाळ, अध्यक्ष, नागपुरी संत्रा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.

सीसीआरआयच्या शास्त्रज्ञांनी प्रादेशिक हवामान विभागाच्या सहकार्याने नुकसान टाळण्यासाठी संशोधनाद्वारे अशा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत.

- रमेश जिचकार, सीईओ, श्रमजीवी ऑरेंज प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, वरुड

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ