शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

नागनदी शुद्धीकरणाला डिसेंट्रलाईज ट्रीटमेंटचा पर्याय; रामनगरला यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 10:35 IST

Nagpur News घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्दे२२ वर्षापूर्वी सुचविला होता उपाय

नागनदी पुनरुज्जीवन परिक्रमा

नागपूर : कोटीच्या कोटी उड्डाणे करूनही चुकीच्या दिशेने वाटचाल करून नागनदी स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रदूषणाचे मूळ स्रोत समजणे व त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. घराघरातून निघणारे सांडपाणी हेच नागनदीच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बाहेर शुद्धीकरणाचे उपाय करण्यापेक्षा घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

विशेष म्हणजे २२ वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा नागनदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हाही सहस्रभोजनी यांच्या ‘इकोसिटी फाऊंडेशन’ने अतिशय कमी खर्चाचे हेच तंत्रज्ञान सुचविले होते आणि त्याचे नियोजन दिल्ली येथे झालेल्या परिषदेत सादरही केले होते. मात्र एखाद्या कंपनीला काम देऊन आपली जबाबदारी झटकणाऱ्या प्रशासकांनी तेव्हाही या आराखड्याकडे दुर्लक्ष केले हाेते. मात्र फाऊंडेशनने हार न मानता त्यांच्या डिसेंट्रलाइज पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरणाचा यशस्वी प्रयाेग केला. रामनगरला त्याचे प्रत्यक्ष अवलाेकन केले जाऊ शकते.

डिसेंट्रलाइज ट्रीटमेंट म्हणजे

डिसेंट्रलाइज काही माेठे तंत्रज्ञान नाही तर घरातील कचरा उचल करण्याप्रमाणे स्वत:चे पाणी स्वत:च शुद्धीकरण करणे हाेय. त्यामुळे सिवेजची घाण नाग नदीत पाेहचणारच नाही आणि स्वच्छ पाणी प्रवाहित हाेईल. वैयक्तिक घर, फ्लॅट स्कीम, माेठी वसाहत, एक किंवा दाेन वस्त्या मिळूनही डिसेंट्रलाइजचे नियाेजन करणे शक्य असल्याचे सहस्रभोजनी यांनी सांगितले. त्यामुळे नदी शुद्धीकरणाच्या नावाखाली एका कंपनीला पैसा देण्यापेक्षा नागरिकांकडे वळता करून तसे नियाेजन करण्यास प्राेत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहे रामनगर पॅटर्न

फाऊंडेशनने रामनगर येथे एका ८ फ्लॅटच्या वसाहतीमध्ये डिसेंट्रलाइजचा प्रयाेग साकार केला आहे. प्रद्युम्न यांनी सांगितले, इमारतीचे सिवेज नेणाऱ्या पाईपला जाेडून १३ चेंबर तयार करण्यात आले. यातील पहिले ६ सेटलिंग चेंबर आहेत. सांडपाणी वरखाली हाेऊन या चेंबरमधून वाहत जाते. यानंतर ४ चेंबरमध्ये अनएराेबिक बिफल रिॲक्टर्सचा वापर केला आहे. पुढे तीन अनएराेबिक फिल्टर चेंबरमध्ये चारकाेलचे बेड तयार केले आहेत. यातून वाहत जाणारे सांडपाणी स्वच्छ हाेऊनच बाहेर निघते. यासमाेर काही विशिष्ट प्रजातीची झाडे लावून उरलेले प्रदूषणही संपविले जाते. पुढे हे शुद्ध पाणी मुख्य सिवर लाईनला जाेडून नाग नदीत प्रवाहित केले जाते. आता शंकरनगरच्या एका वसाहतीमध्येही हे व्यवस्थापन केले जात असल्याचे सहस्रभोजनी यांनी सांगितले.

डिसेंट्रलाइज का आवश्यक?

घरातून निघणारे सिवेज केवळ सांडपाणी नाही तर अनेक प्रकारचे घातक रसायन घेऊन निघत असते. हे रसायन थेट नदीत गेल्यास नैसर्गिक झऱ्यांवर गंभीर परिणाम हाेतात. पाण्यातील ऑक्सिजन नष्ट हाेऊन वनस्पती व जलचर प्राण्यांच्या जैवविविधतेला धाेका पाेहचताे. एकीकडे सिवेजचे रसायन व दुसरीकडे अतिक्रमण यामुळे नैसर्गिक स्रोत नामशेष झाले असून नाग नदीमध्ये आता केवळ घाण वाहत आहे. त्यामुळे सिवेजचे प्रदूषण नदीत पाेहचूच नये म्हणून डिसेंट्रलाइजचा उपाय करणे औचित्याचे ठरेल, असा दावा सहस्रभोजनी यांनी केला.

टॅग्स :riverनदी