शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

नागनदी शुद्धीकरणाला डिसेंट्रलाईज ट्रीटमेंटचा पर्याय; रामनगरला यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 10:35 IST

Nagpur News घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्दे२२ वर्षापूर्वी सुचविला होता उपाय

नागनदी पुनरुज्जीवन परिक्रमा

नागपूर : कोटीच्या कोटी उड्डाणे करूनही चुकीच्या दिशेने वाटचाल करून नागनदी स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रदूषणाचे मूळ स्रोत समजणे व त्यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. घराघरातून निघणारे सांडपाणी हेच नागनदीच्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बाहेर शुद्धीकरणाचे उपाय करण्यापेक्षा घरातून निघणारी घाण नदीत पोहचूच नये, यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिसेंट्रलाईज सिवेज ट्रीटमेंटचे तंत्र सर्वोत्तम उपाय ठरेल, असा ठाम विश्वास पर्यावरण तज्ज्ञ प्रद्युम्न सहस्रभोजनी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

विशेष म्हणजे २२ वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा नागनदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हाही सहस्रभोजनी यांच्या ‘इकोसिटी फाऊंडेशन’ने अतिशय कमी खर्चाचे हेच तंत्रज्ञान सुचविले होते आणि त्याचे नियोजन दिल्ली येथे झालेल्या परिषदेत सादरही केले होते. मात्र एखाद्या कंपनीला काम देऊन आपली जबाबदारी झटकणाऱ्या प्रशासकांनी तेव्हाही या आराखड्याकडे दुर्लक्ष केले हाेते. मात्र फाऊंडेशनने हार न मानता त्यांच्या डिसेंट्रलाइज पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरणाचा यशस्वी प्रयाेग केला. रामनगरला त्याचे प्रत्यक्ष अवलाेकन केले जाऊ शकते.

डिसेंट्रलाइज ट्रीटमेंट म्हणजे

डिसेंट्रलाइज काही माेठे तंत्रज्ञान नाही तर घरातील कचरा उचल करण्याप्रमाणे स्वत:चे पाणी स्वत:च शुद्धीकरण करणे हाेय. त्यामुळे सिवेजची घाण नाग नदीत पाेहचणारच नाही आणि स्वच्छ पाणी प्रवाहित हाेईल. वैयक्तिक घर, फ्लॅट स्कीम, माेठी वसाहत, एक किंवा दाेन वस्त्या मिळूनही डिसेंट्रलाइजचे नियाेजन करणे शक्य असल्याचे सहस्रभोजनी यांनी सांगितले. त्यामुळे नदी शुद्धीकरणाच्या नावाखाली एका कंपनीला पैसा देण्यापेक्षा नागरिकांकडे वळता करून तसे नियाेजन करण्यास प्राेत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहे रामनगर पॅटर्न

फाऊंडेशनने रामनगर येथे एका ८ फ्लॅटच्या वसाहतीमध्ये डिसेंट्रलाइजचा प्रयाेग साकार केला आहे. प्रद्युम्न यांनी सांगितले, इमारतीचे सिवेज नेणाऱ्या पाईपला जाेडून १३ चेंबर तयार करण्यात आले. यातील पहिले ६ सेटलिंग चेंबर आहेत. सांडपाणी वरखाली हाेऊन या चेंबरमधून वाहत जाते. यानंतर ४ चेंबरमध्ये अनएराेबिक बिफल रिॲक्टर्सचा वापर केला आहे. पुढे तीन अनएराेबिक फिल्टर चेंबरमध्ये चारकाेलचे बेड तयार केले आहेत. यातून वाहत जाणारे सांडपाणी स्वच्छ हाेऊनच बाहेर निघते. यासमाेर काही विशिष्ट प्रजातीची झाडे लावून उरलेले प्रदूषणही संपविले जाते. पुढे हे शुद्ध पाणी मुख्य सिवर लाईनला जाेडून नाग नदीत प्रवाहित केले जाते. आता शंकरनगरच्या एका वसाहतीमध्येही हे व्यवस्थापन केले जात असल्याचे सहस्रभोजनी यांनी सांगितले.

डिसेंट्रलाइज का आवश्यक?

घरातून निघणारे सिवेज केवळ सांडपाणी नाही तर अनेक प्रकारचे घातक रसायन घेऊन निघत असते. हे रसायन थेट नदीत गेल्यास नैसर्गिक झऱ्यांवर गंभीर परिणाम हाेतात. पाण्यातील ऑक्सिजन नष्ट हाेऊन वनस्पती व जलचर प्राण्यांच्या जैवविविधतेला धाेका पाेहचताे. एकीकडे सिवेजचे रसायन व दुसरीकडे अतिक्रमण यामुळे नैसर्गिक स्रोत नामशेष झाले असून नाग नदीमध्ये आता केवळ घाण वाहत आहे. त्यामुळे सिवेजचे प्रदूषण नदीत पाेहचूच नये म्हणून डिसेंट्रलाइजचा उपाय करणे औचित्याचे ठरेल, असा दावा सहस्रभोजनी यांनी केला.

टॅग्स :riverनदी