शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विरोधकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न : राजनाथसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:07 PM

आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. मात्र विरोधी पक्ष तसेच कॉंग्रेसकडून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये भाजपाविषयी भ्रामक माहितीचा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित विजयी संकल्प सभेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देजाहीर सभेतून घेतला विजयाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. मात्र विरोधी पक्ष तसेच कॉंग्रेसकडून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये भाजपाविषयी भ्रामक माहितीचा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित विजयी संकल्प सभेदरम्यान ते बोलत होते.कस्तूरचंद पार्क येथे झालेल्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विनोद सोनकर, दुश्यंत गौतम, व्ही.सतीश, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह आमदार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.गरिबी हटाओच्या नावाखाली कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चीच गरिबी हटविली. मात्र निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची बरोबर आठवण येते. विरोधकांचे राजकारण भयाभोवतीच फिरते आहे. खोट्या गोष्टी समोर करुन अपप्रचार करण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, वंचितांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप गडकरी यांनी लावला. धर्मपाल मेश्राम यांनी संचालन केले.कॉंग्रेसला हडपायची होती इंदू मिलची जागा : मुख्यमंत्रीइंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, ही कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. मात्र संपुआ व आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्मारकासाठी एक इंचही जमीन मिळाली नाही.कॉंग्रेसला तर इंदू मिलची जागा हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर मी फाईल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. त्यांनी संबंधित मंत्र्यांना बोलावून तीन दिवसात जमीन स्मारकासाठी मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले व खरोखरच पुढील तीन दिवसात जागा मिळाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल येथे २०२० पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक पूर्णत्वास येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.विदर्भवाद्यांची निदर्शनेदरम्यान, सभेदरम्यान काही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांनी पत्रकेदेखील भिरकावली. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे लोक कॉंग्रेसने पाठविले होते, असा आरोप यावेळी गडकरी यांनी केला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा