शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या निवडीला विरोध हे राजकीय षडयंत्र, आ. अभिजीत वंजारी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 10:40 IST

गांधी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यामुळे विरोध

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुरेश द्वादशीवार यांच्या निवडीला विरोध हे राजकीय षडयंत्र असल्याची टीका विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी एक निवेदन सादर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, मुळात अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाकरिता राज्य शासनाकडून आर्थिक मदत होत असते, परंतु याचा अर्थ शासनाच्या मर्जीप्रमाणे अशा प्रकारच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये हस्तक्षेप व्हावा, असा नाही. महाराष्ट्रात बोटावर मोजता याव्या, इतक्या साहित्य क्षेत्रातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास असणाऱ्या अग्रणी साहित्यिकांमध्ये प्रा.द्वादशीवार यांचे नाव आहे, परंतु गांधींच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यानेच शासनामध्ये असलेल्या नेत्यांनी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये थेट हस्तक्षेप करून त्यांच्या नावाला विराेध केला. याचा निषेधही वंजारी यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.

गांधी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यामुळे विरोध

१२ ऑक्टोबरला नागपुरात ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या डॉ.मुनघाटे यांनी संपादित केलेल्या पुस्तकावर बोलताना मराठीतील विशिष्ट साहित्यिकांनी आपल्या लोकांकडून महात्मा गांधींवर कसा अन्याय केला, असे मत व्यक्त केले होते, परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य असते. ही बाब लक्षात न घेता, केवळ गांधी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असल्यामुळे प्रा.सुरेश द्वादशीवारांच्या नावाला विरोध करणे, यावरून विद्यमान सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांची व साहित्यिकांची कोणती मानसिकता लक्षात येते, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :SocialसामाजिकAbhijit Wanjariअभिजीत वंजारीnagpurनागपूरakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ