शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, रविवारपासून संविधान चौकात आंदोलन

By कमलेश वानखेडे | Updated: September 9, 2023 17:01 IST

कृती समितीची घोषणा : रविवारपासून आंदोलनाची हाक

नागपूर : मराठा समाजासला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यास आपला विरोध नाही, अशी भूमिका मांडत ‘सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समिती’ ने रविवार, १० सप्टंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

कृती समितीचे संयोजक पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ११ वाजता संविधान चौकात धरणे आंदोलनास सुरुवात होईल. सुरुवातील शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल. समाजात जनजागरण केले जाईल. मात्रसरकारने लेखी आश्वासन देईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. मात्र, सरकारने मराठा समाज आंदोलकांच्या दबावात येऊन काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील कुणबी- ओबीसी पेटून उठेल व तीव्र आंदोलन होईल, असा इशाराही शहाणे पाटील यांनी दिला. ते म्हणाले, आमचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, यासाठी आमचेही समर्थन आहे. तसे नसते तर मराठा समाजाच्या क्रांती मोर्चात मोठ्या संख्येने विदर्भातील कुणबी समाज सहभागी झाला नसता, असेही त्यांनी सांगितले.

सुरेश गुडधे पाटील यांनी केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव संमत करण्याची मागणी केली. हे आंदोलन राजकीय नसून सामाजिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजेश काकडे यांनी जातीय जनगनना करण्याची मागणी केली. आंदोलनात येणाऱ्या प्रत्येक कुणबी नेत्याचे स्वागत करून पण त्यांना पक्षाची भूमिका आंदोलनाच्या व्यासपीठावरून मांडू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कृती समितीचे नरेश बरडे, अवंतिका लेकुरवाळे, सुषमा भड, सुरेश कोंगे, जानराव केदार, प्रल्हाद पडोळे, बाबा तुमसरे, गुुणेश्वर आरीकर, राजेंद्र कोरडे, सुरेश वर्षे, अरुण वराडे, राजेंद्र ठाकरे, विवेक देशमुख, दीनकरराव जीवतोडे, राजेश चुटे, राज तिजारे, प्रकाश वसु, रमेश चोपडे, बाळा शिंगणे आदी उपस्थित होते.

अशा आहेत प्रमुख मागण्या...

- सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.- ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये- परराज्यातील लोकांना कुठल्याही कागदपत्राच्या आधारे महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र देऊ नये.- जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.- ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण द्यावे.- केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारणnagpurनागपूरkunbiकुणबी