शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे

By योगेश पांडे | Updated: October 6, 2025 19:16 IST

महसूलमंत्री बावनकुळे : ओबीसी–मराठा संघर्ष होऊ नये ही सर्वांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले आहे. बळीराजा संकटात असताना सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहेच. मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता विरोधक व सर्वच राजकीय पक्षांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

समाजातील मनभेद बाजूला ठेवून राज्याला संकटातून बाहेर काढण्यावर भर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. कोणीही समाजात भडकावू वक्तव्य करू नये, चिथावणी देऊ नये. दोन्ही समाजात भाऊबंदकी टिकली पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.अशा काळात दोन समाजांना समोरासमोर आणणे योग्य नाही. सध्या शेतकऱ्यांना मदत करणे हीच खरी वेळेची गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

आघाडी सरकारने आकसापोटी दाखल केले होते गुन्हे

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द झाले होते. त्या विरोधात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले. मात्र त्या वेळी आघाडी सरकारने आमच्याविरुद्ध आकसापोटी गुन्हे दाखल केले. न्यायालयाने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले असून हा न्यायाचा विजय आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील आरोपांचे खंडन

पुण्यातील घटनेनंतर काँग्रेसकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. चंद्रकांत पाटील हे संघाच्या संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे आयुष्य लोकांसाठी आदर्श आहे. अशा व्यक्तीवर गुन्हेगाराला मदत केल्याचा आरोप करणे म्हणजे संस्कारहीन वर्तन आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांकडे त्यांच्या संस्कारांचा एक टक्का सुद्धा नाही, असे बावनकुळे म्हणाले.

अनिल देशमुखांचे आरोप ‘राजकीय स्टंटबाजी’

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दहा किलोचा गोटा मारला गेल्याचा दावा केला होता व तो हास्यास्पद आहे. मी तो अहवाल पाहिलेला नाही, पण हे सर्व राजकारण आणि स्टंटबाजीचा भाग आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होतो, असे बावनकुळे म्हणाले.

२०२९ पर्यंत वीजदर ५० टक्के कमी होणार

सध्याची वीजदर वाढ ही तात्पुरती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमईआरसीकडे असा प्रस्ताव सादर केला आहे की, २०२९ पर्यंत विजेचे दर ५० टक्क्यांनी कमी होतील. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होणार आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Prioritize farmers' welfare, not politics, opposition urged amid crop losses.

Web Summary : Revenue Minister Bawankule urges political parties to aid flood-hit farmers instead of engaging in politics. He addressed OBC and Maratha community harmony. He refuted allegations against Chandrakant Patil and criticized Anil Deshmukh's statements. Bawankule claimed electricity rates will reduce by 50% by 2029.
टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी