शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे

By योगेश पांडे | Updated: October 6, 2025 19:16 IST

महसूलमंत्री बावनकुळे : ओबीसी–मराठा संघर्ष होऊ नये ही सर्वांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले आहे. बळीराजा संकटात असताना सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहेच. मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता विरोधक व सर्वच राजकीय पक्षांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

समाजातील मनभेद बाजूला ठेवून राज्याला संकटातून बाहेर काढण्यावर भर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. कोणीही समाजात भडकावू वक्तव्य करू नये, चिथावणी देऊ नये. दोन्ही समाजात भाऊबंदकी टिकली पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.अशा काळात दोन समाजांना समोरासमोर आणणे योग्य नाही. सध्या शेतकऱ्यांना मदत करणे हीच खरी वेळेची गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

आघाडी सरकारने आकसापोटी दाखल केले होते गुन्हे

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द झाले होते. त्या विरोधात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले. मात्र त्या वेळी आघाडी सरकारने आमच्याविरुद्ध आकसापोटी गुन्हे दाखल केले. न्यायालयाने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले असून हा न्यायाचा विजय आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील आरोपांचे खंडन

पुण्यातील घटनेनंतर काँग्रेसकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. चंद्रकांत पाटील हे संघाच्या संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे आयुष्य लोकांसाठी आदर्श आहे. अशा व्यक्तीवर गुन्हेगाराला मदत केल्याचा आरोप करणे म्हणजे संस्कारहीन वर्तन आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांकडे त्यांच्या संस्कारांचा एक टक्का सुद्धा नाही, असे बावनकुळे म्हणाले.

अनिल देशमुखांचे आरोप ‘राजकीय स्टंटबाजी’

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दहा किलोचा गोटा मारला गेल्याचा दावा केला होता व तो हास्यास्पद आहे. मी तो अहवाल पाहिलेला नाही, पण हे सर्व राजकारण आणि स्टंटबाजीचा भाग आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होतो, असे बावनकुळे म्हणाले.

२०२९ पर्यंत वीजदर ५० टक्के कमी होणार

सध्याची वीजदर वाढ ही तात्पुरती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमईआरसीकडे असा प्रस्ताव सादर केला आहे की, २०२९ पर्यंत विजेचे दर ५० टक्क्यांनी कमी होतील. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होणार आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Prioritize farmers' welfare, not politics, opposition urged amid crop losses.

Web Summary : Revenue Minister Bawankule urges political parties to aid flood-hit farmers instead of engaging in politics. He addressed OBC and Maratha community harmony. He refuted allegations against Chandrakant Patil and criticized Anil Deshmukh's statements. Bawankule claimed electricity rates will reduce by 50% by 2029.
टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी