शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे

By योगेश पांडे | Updated: October 6, 2025 19:16 IST

महसूलमंत्री बावनकुळे : ओबीसी–मराठा संघर्ष होऊ नये ही सर्वांची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले आहे. बळीराजा संकटात असताना सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहेच. मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता विरोधक व सर्वच राजकीय पक्षांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

समाजातील मनभेद बाजूला ठेवून राज्याला संकटातून बाहेर काढण्यावर भर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. कोणीही समाजात भडकावू वक्तव्य करू नये, चिथावणी देऊ नये. दोन्ही समाजात भाऊबंदकी टिकली पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.अशा काळात दोन समाजांना समोरासमोर आणणे योग्य नाही. सध्या शेतकऱ्यांना मदत करणे हीच खरी वेळेची गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

आघाडी सरकारने आकसापोटी दाखल केले होते गुन्हे

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे २७ टक्के आरक्षण रद्द झाले होते. त्या विरोधात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले. मात्र त्या वेळी आघाडी सरकारने आमच्याविरुद्ध आकसापोटी गुन्हे दाखल केले. न्यायालयाने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले असून हा न्यायाचा विजय आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील आरोपांचे खंडन

पुण्यातील घटनेनंतर काँग्रेसकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी भूमिका मांडली. चंद्रकांत पाटील हे संघाच्या संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे आयुष्य लोकांसाठी आदर्श आहे. अशा व्यक्तीवर गुन्हेगाराला मदत केल्याचा आरोप करणे म्हणजे संस्कारहीन वर्तन आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांकडे त्यांच्या संस्कारांचा एक टक्का सुद्धा नाही, असे बावनकुळे म्हणाले.

अनिल देशमुखांचे आरोप ‘राजकीय स्टंटबाजी’

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दहा किलोचा गोटा मारला गेल्याचा दावा केला होता व तो हास्यास्पद आहे. मी तो अहवाल पाहिलेला नाही, पण हे सर्व राजकारण आणि स्टंटबाजीचा भाग आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होतो, असे बावनकुळे म्हणाले.

२०२९ पर्यंत वीजदर ५० टक्के कमी होणार

सध्याची वीजदर वाढ ही तात्पुरती आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमईआरसीकडे असा प्रस्ताव सादर केला आहे की, २०२९ पर्यंत विजेचे दर ५० टक्क्यांनी कमी होतील. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होणार आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Prioritize farmers' welfare, not politics, opposition urged amid crop losses.

Web Summary : Revenue Minister Bawankule urges political parties to aid flood-hit farmers instead of engaging in politics. He addressed OBC and Maratha community harmony. He refuted allegations against Chandrakant Patil and criticized Anil Deshmukh's statements. Bawankule claimed electricity rates will reduce by 50% by 2029.
टॅग्स :nagpurनागपूरChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी