शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपूर जिल्हा परिषदेतील विरोधक कार्यकारी अभियंत्यावर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:56 IST

पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी केला.

ठळक मुद्दे१५ दिवस शिल्लक असताना टंचाईच्या कामाला सुरुवात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी केला.बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीची बैठकीत निधान यांनी पाणी पुरवठा विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. तीन दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास विरोधी बाकावरील सर्व सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अभियंत्याना हटविण्यासंदर्भांत निवेदन देतील. जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता, विभागाने पूर्वीच याचे नियोजन करायला हवे होते. यावर अभियंता टाकळीकर यांना विचारणा केली असता टोलवाटोलवीचे उत्तर देतात. १५ दिवसात कामे न झाल्यास टंचाईचे नियोजन पूर्णत: फिस्कटेल, याला सर्वस्वी सत्ता पक्ष जबाबदार राहील, असेही निधान म्हणाले. सभेदरम्यान, तीर्थक्षेत्र कामामध्ये गैरव्यवहाराचा आरोप सदस्य नाना कंभाले यांनी लावला. तीर्थक्षेत्राची कामे भाजपाच्या काळात अंदाजपत्रक आणि नियमात राहूनच झाली आहे. त्यात कुठल्याही प्रकारची अनियमितता नाही, असा पलटवार करून सभागृहात कंभाले यांचा आरोप सुद्धा निधान यांनी खोडून लावला. मात्र, या कामांवर चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याची भूमिका अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी घेतली.कोरोनाकाळात जिल्ह्यातील काही कंपन्या सुरू झाल्यात. असंख्य कामगार कामावर रुजू होत आहे, मात्र, यामध्ये किती कामगार शिफ्टनिहाय असावे, सोशल डिस्टन्सिंग, कामगारांच्या जेवण, निवासाची व्यवस्थेची सीईओनी पाहणी करावी, जेणेकरून कोरोनाचा उद्रेक अशा प्रकारातून होणार नाही. विकासकामांना अद्यापही मंजुºया नाही, त्यासाठी सर्वसाधारण सभा लवकर घेणे गरजेचे आहे, अशीही सूचना निधान यांनी केली.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर