शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:48 IST

माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांनी उभारलेली ‘इंडिया’ आघाडी म्हणजे ‘बारुद नसलेला बॉम्ब’ असून, त्यांच्याकडून काहीच होणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, इंडिया आघाडीचे घटक पक्ष मुंबई बैठकीसाठी एकत्र आले आहे. ही त्यांची नौटंकी असून, ते मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील, दोन दिवस फिरतील आणि निघून जातील. त्यांच्या बैठकीत कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या आघाडीत कुणीही कुणासोबत नाही. आघाडीतील १०-१२ पक्ष असे आहेत की, त्यांचे कुठेही मंत्रीदेखील नाहीत. पंतप्रधान मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात काही करता येईल का? असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाच्या ४५हून अधिक लोकसभा जागांवर विजय होईल. माझ्या लोकसभा प्रवासात लोक मोदी-मोदी असे नारे लावून समर्थन देत आहेत.

- काँग्रेसने केला डॉ. बाबासाहेबांचा पराभव

प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांच्या आघाडीत बोलाविले नसल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना बोलाविण्याचा निर्णय त्यांचा असला तरीदेखील त्यांची भूमिका कधीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पटली नाही. काँग्रेस नेहमीच डॉ. आंबेडकरांविरुद्धच राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनेच केला होता, तेव्हाही आणि आजही त्यांची तीच भूमिका कायम आहे.

कर्नाटकच्या जनतेला काँग्रेसने फसविले

- कर्नाटक निवडणुकीत जे आश्वासन काँग्रेसने तेथील जनतेला दिले आहे, ते कधीही पूर्ण करू शकणार नाही. त्यांनी कर्नाटकच्या जनतेला फसविले आहे. १० वर्षांचे बजेट जरी ५ वर्षांत खर्च केले तरीदेखील ती आश्वासने पूर्ण होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

ट्रिपल इंजिन सरकार आता एकमेकांना धक्के मारत आहे - वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सातत्याने महायुती सरकारवर प्रहार करताना दिसत आहेत. आता त्यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारत आहेत,’ असे ट्वीट करीत सरकारवर निशाणा साधला आहे.

वडेट्टीवार यांनी व्टीटमध्ये म्हटले आहे की, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधने घातली. पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधने हटवल्याचे वृत्त आले आहे. यातून सरकारची नाचक्की झाली. सरकारमध्ये कोणत्याही विषयावर एक धोरण नाही, फक्त आपापल्या पक्षाच्या नेत्यांसाठी सरकारमधील तिन्ही पक्ष राबत आहेत. सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी