शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

फक्त पोस्टरबाजी व रंगरंगोटीत ‘स्वच्छता’! कसा येणार नागपूरचा अव्वल नंबर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:00 IST

केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.

ठळक मुद्देसर्वेक्षणाबाबत अधिकारी उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजित बांगर संवेदनशील आहेत. त्यांनी कार्यालयांचे अचानक निरीक्षण केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले. परंतु त्यानंतरही झोन कार्यालये सक्रिय नसल्याचे चित्र आहे. याचा फटका सर्वेक्षणाच्या क्रमावारीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.वर्ष २०१७ मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर १३३ व्या क्रमांकावर होते. प्रयत्नानंतर २०१८ मध्ये क्रमवारीत सुधारणा होऊ न ५५ व्या क्रमांकावर आले. घराघरातून कचरा संकलन करून भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे नेण्यात येतो. परंतु यावर समाधान मानता येणार नाही. त्यामुळेच आयुक्तांनी झोन कार्यालयांचा अचानक दौरा केला. नेहरूनगर व गांधीबाग झोनचे आरोग्य निरीक्षक यांना निलंबित केले. अनेक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला होता. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास तात्काळ निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसत नाही.बॅनर व पोस्टरबाजीने भागणार नाहीस्वच्छ सर्वेक्षणाबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बॅनर, पोस्टर व भिंतीची रंगरंगोटी क रण्यात आली आहे. यात ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’चा संदेश देण्यात आला आहे. मात्र कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुधारणा झाली नसल्याने याचा फारसा लाभ होताना दिसत नाही. कनक रिसोर्सेस कंपनीकडे घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी आहे. शहरालगतच्या भागात दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा उडघड्यावर टाकावा लागतो.कचरा प्रक्रियेत मनपा माघारलीओला व सुका कचरा वेगवेळा संकलित करण्यासाठी डस्टबिन वितरण अयशस्वी ठरले आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया होत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बायोमायनिंग प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय दुसरी प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही. स्वच्छता सर्वेक्षणात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचा मुद्दा महागात पडणार असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान