शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

फक्त पोस्टरबाजी व रंगरंगोटीत ‘स्वच्छता’! कसा येणार नागपूरचा अव्वल नंबर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:00 IST

केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.

ठळक मुद्देसर्वेक्षणाबाबत अधिकारी उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय पथक न सांगता स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणार असल्याचे आधीच निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी अचानक केंद्राचे पथक नागपुरात पोहचले. परंतु पथकाच्या दौऱ्याबाबत महापालिका प्रशासन सक्रिय असल्याचे दिसत नाही. विशेषत: झोनचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, झोनल अधिकारी अजूनही सक्रिय झाल्याचे दिसत नाहीत.स्वच्छता सर्वेक्षणाच्या नावाखाली फ क्त पोस्टर, बॅनरबाजी व भिंतीची रंगरंगोटी करून सज्ज असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात रस्त्यांच्या कडेला, कचरा संकलन सेंटर, कॉलनी, मोकळे भूखंड व ले-आऊ ट येथे कचऱ्या चे ढिगारे कायम आहेत. तो उचलण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजित बांगर संवेदनशील आहेत. त्यांनी कार्यालयांचे अचानक निरीक्षण केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले. परंतु त्यानंतरही झोन कार्यालये सक्रिय नसल्याचे चित्र आहे. याचा फटका सर्वेक्षणाच्या क्रमावारीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.वर्ष २०१७ मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहर १३३ व्या क्रमांकावर होते. प्रयत्नानंतर २०१८ मध्ये क्रमवारीत सुधारणा होऊ न ५५ व्या क्रमांकावर आले. घराघरातून कचरा संकलन करून भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे नेण्यात येतो. परंतु यावर समाधान मानता येणार नाही. त्यामुळेच आयुक्तांनी झोन कार्यालयांचा अचानक दौरा केला. नेहरूनगर व गांधीबाग झोनचे आरोग्य निरीक्षक यांना निलंबित केले. अनेक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही स्वरूपाची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला होता. स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास तात्काळ निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसत नाही.बॅनर व पोस्टरबाजीने भागणार नाहीस्वच्छ सर्वेक्षणाबाबत लोकांत जागृती निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बॅनर, पोस्टर व भिंतीची रंगरंगोटी क रण्यात आली आहे. यात ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’चा संदेश देण्यात आला आहे. मात्र कचरा संकलनाच्या प्रक्रियेत सुधारणा झाली नसल्याने याचा फारसा लाभ होताना दिसत नाही. कनक रिसोर्सेस कंपनीकडे घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी आहे. शहरालगतच्या भागात दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा उडघड्यावर टाकावा लागतो.कचरा प्रक्रियेत मनपा माघारलीओला व सुका कचरा वेगवेळा संकलित करण्यासाठी डस्टबिन वितरण अयशस्वी ठरले आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया होत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बायोमायनिंग प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय दुसरी प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही. स्वच्छता सर्वेक्षणात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचा मुद्दा महागात पडणार असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान