शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
3
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
4
Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!
5
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
6
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
7
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
8
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
9
Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
11
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
12
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
13
'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
14
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 
15
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
16
Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम 
17
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
18
Video: "हे चुकीचं आहे रे..."; रोहित शर्मा चिडला, लहान मुलीच्या आईवडिलांना चांगलंच सुनावलं!
19
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
20
BJP MIM Alliance: सत्तेसाठी भाजपाने फक्त एआयएमआयएम नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना, प्रहारची बांधली होती मोट
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत अनुकंप तत्त्वावर केवळ एकाची नियुक्ती!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 26, 2023 14:10 IST

नागपूर केंद्रीय जीएसटी विभाग : गरजूंना वर्षातच नोकरी मिळावी

नागपूर : अनुकंप तत्त्वावर एक वर्षाच्या आत भरती करण्याचे सरकारचे धोरण आहे. पण देशात अनेक सरकारी विभागात अनुकंप तत्त्वावर भरतीसाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. केंद्रीय जीएसटी विभागात नागपूर झोनअंतर्गत २०१९ ते २०२३ या कालावधीत केवळ एक जणाची भरती करण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. संगिता थूल यांनी ४ ऑगस्टच्या अर्जात २०१९ ते २०२३ या कालावधीत विभागाला प्राप्त झालेले अनुकंप भरतीचे अर्ज, नियुक्ती आणि प्रलंबित अर्जाची माहिती विचारली होती. यावर उत्तर देताना विभागाने वर्ष २०२९ मध्ये ३ अर्ज, २०२० मध्ये ३, २०२१ मध्ये दोन अर्ज प्राप्त झाले तर २०२२ आणि २०२३ मध्ये काहीच अर्ज प्राप्त झाले नसल्याची माहिती दिली. तर पाच वर्षांत केवळ २०२१ मध्ये एक जणाची नियुक्ती करण्यात आली, पण हा अर्ज २०१९ पूर्वी आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित चार वर्षांत कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात चार अर्ज प्रलंबित असल्याचे सांगितले तर चार अर्ज समितीने छाननीनंतर खारीज केल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय जीएसटी एससी, एसटी कर्मचारी वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थूल म्हणाले, देशात अनेक सरकारी विभागात अनुकंप तत्त्वावर नोकर भरती होते असे नाही. गरजू असलेल्यांना नोकरी मिळालीच पाहिजे. सरकारी खात्यातील नोकरदार मेल्यानंतर त्यांच्या वारसाला नोकरी मिळतेच, हा समज चुकीचा आहे. वारसांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. याचे केंद्रीय जीएसटी विभाग सर्वोत्तम उदाहरण आहे.

टॅग्स :jobनोकरीGSTजीएसटी