शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

फक्त ७२ जाती विषारी

By admin | Updated: August 1, 2014 01:12 IST

श्रावणपंचमी म्हणजे नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती व आकर्षण, जिज्ञासा

भारतात आढळतात २८२ प्रकारचे सापनागपूर : श्रावणपंचमी म्हणजे नागपंचमी अर्थात सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो. साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जेवढी भीती व आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५ जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ७२ साप हे विषारी असतात. त्यातूनही पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात. सापांचे प्रकार अनेक आहेत. त्यात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे. विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे व काही समुद्री सापांचा समावेश आहे. एकूण विषारी सर्पदंशांपैकी निम्म्याहून अधिक दंश नाग व मण्यार यांचेच असतात. त्याखालोखाल फुरसे, घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार ह्यांचे विष मुख्यत: मज्जासंस्थेस तर फुरसे, घोणस यांचे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस घातक असते. विषारी सापाच्या अगदी अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांनाही थोडे का होईना विष असते.ंसापांना वाचवाअन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या जगातील मानवी लोकसंख्येच्या चौपट आहे. उंदरांच्या मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसिससारखे घातक रोग होतात. उंदरांचा बंदोबस्त फक्त सापच करू शकतात. त्यामुळे सापांची हत्या करू नका, असे आवाहन सर्पमित्र स्वप्नील बोधाने यांनी केले आहे. बोधाने यांनी सांगितले, नागपंचमीनिमित्त आजही अनेक भागांत गारुडी टोपलीमध्ये साप व नाग घेऊन घरोघर हिंडताना दिसतात. बरेचसे भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करून त्यांना दूध प्यायला देतात. मात्र दूध हे सापाचे अन्न नसून उंदीर, बेडूक ह्यासारखे प्राणी त्याचे मुख्य अन्न आहे. गारुड्यांजवळ असलेल्या सापांचे ‘विषदंत’ म्हणजे दात काढून टाकलेले असतात. या सापांना सात ते आठ दिवसांपासून अन्नपाण्याविना उपाशीच ठेवलेले असते. त्यामुळे जेव्हा भाविक त्या सापाला दूध पाजतात तेव्हा उपाशी साप नाईलाजाने दूध प्राशन करतो व नंतर काही दिवसांनी मृत्युमुखी पडतो.महिन्याला २५० साप पकडतातघर, कार्यालय व रस्त्यावर आलेल्या सापांना जीवदान देण्याचे कार्य विदर्भ सर्पमित्र समिती, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल आणि वाईल्डसर संस्था ही अनेक वर्षांपासून करीत आहेत. शहरातील सर्पमित्र एका दूरध्वनीवर आपल्या जीवाची बाजी लावून साप पकडतात आणि त्याला जंगलातही सोडतात. महिन्याला सर्पमित्रांकडून साधारण २५० साप पकडले जात असल्याची माहिती आहे.हे करावन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी संस्था सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन, एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (वाईल्ड सीईआर) या संस्थेने नागपंचमीनिमित्त गारुड्यांकडून सापांचा असा छळ होऊ नये म्हणून गारुडी साप घेऊन आल्यास वन विभागाला किंवा संस्थेच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रयत्नाने एका सापाचे जरी प्राण वाचले तरी नागपंचमी खऱ्या अर्थाने साजरी होईल, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बहार बावीस्कर यांनी केले. गारुड्याचा खेळ चालू असल्याचे निदर्शनास आल्यास वन विभागाला कळवा किंवा वाईल्ड सीईआर संस्थेच्या ८२३७६०४१८८ किंवा ८९७५७३७९९१ (मयुरेश जोशी) या क्रमांकावर संपर्क करावा.मनपाची रेफर मेयो, मेडिकलकडेआरोग्य सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. मात्र महापालिका त्याबाबत उदासीन असल्याचेच चित्र शहरामध्ये पाहावयास मिळत आहे. ५० हजार लोकसंख्येसाठी एक बाह्य रु ग्ण विभाग आणि एक लाख लोकसंख्येसाठी रु ग्णालय असे सरकारचे धोरण असताना महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. सद्यस्थितीत तीन रुग्णालये आणि ३५ बाह्य रुग्ण विभाग आहेत. परंतु सुरुवातीपासून कुठेच ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने आलेल्या रुग्णाला मेयो, मेडिकलकडे पाठविले जाते. मेयोमध्ये दीड महिन्यांपासून इंजेक्शनच नाहीइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दीड महिन्यांपासून ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ इंजेक्शनच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून विकत आणावे लागते. त्यांनी आणले तरच ते रुग्णाला दिले जाते. विशेष म्हणजे, विषारी सर्पदंशाच्या रुग्णाला दिवसभरात २० इंजेक्शन दिले जातात. गरीब रुग्णाला हे परवडणारे नाही. शासनाच्या अनास्थेला रुग्ण बळी पडत आहे.