शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निर्यातबंदीनंतर कांद्याच्या किमतीत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 5:06 PM

बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कमी होऊन २० रुपयांवर स्थिरावले आहेत.

ठळक मुद्देभाव २२ ते २५ रुपयेआवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातून निर्यात वाढल्यानंतर अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यातून वगळण्यात आलेल्या कांद्यावर केंद्र शासनाने निर्यातबंदी घातली आहे. त्यानंतर बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कमी होऊन २० रुपयांवर स्थिरावले आहेत.निर्यातबंदीनंतर दरदिवशी कांद्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय बाजारात दरदिवशी २० ट्रक ची आवक होत आहे. बुधवारीही एवढीच आवक होती. यापूर्वी व्यापारी निर्यातीचा फायदा घेत आणि आवक कमी असल्याचे सांगून साठेबाजी करून भाववाढ करीत होते. पुढील काही दिवसात भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.कळमन्याची कांद्याची आवक बुलडाणा, नाशिक, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त आहे. त्यामुळे भाववाढीची शक्यता कमीच आहे. पूर्वी काही व्यापारी पुरवठा कमी असल्याचे कारण सांगून साठेबाजी करीत होते. शिवाय भाववाढ करून नफा कमवित होते. पण निर्यातबंदीनंतर पूर्वीच्या तुलनेत पुरवठा होत आहे. केंद्र सरकारने वेळीच योग्य पावले उचलल्याने भाव कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.रस्त्याच्या कडेला होत आहे विक्रीअनेक युवक कळमन्यातून कांदे खरेदी करून छोट्या बोरीमध्ये ५ आणि १० किलो पॅक करून विक्री करीत आहेत. किरकोळमध्ये कांद्याचे ३० ते ३५ रुपये भाव आहेत. तर हे युवक २२ ते २५ रुपयांत विक्री करीत आहेत. सध्या १० किलो कांद्याचे कट्टे जागोजागी उपलब्ध आहेत. ग्राहकांना स्वस्तात मिळत आहे.

 

टॅग्स :onionकांदा