शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

एक होता ‘श्रीनिवास’ नावाचा वाघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

अभय लांजेवार उमरेड : राज्यभरात गाजलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन सीसीएफ ...

अभय लांजेवार

उमरेड : राज्यभरात गाजलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन सीसीएफ म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी काही जी-हुजुरी करणाऱ्या वन्यप्रेमींनी साहेबांना खुश करण्यासाठी एका वाघाचे चक्क ‘श्रीनिवास’ असे नामकरण केले. साधारणत: पाच ते सात वर्षांपर्वी करण्यात आलेल्या या नामकरणानंतर आता दीपाली चव्हाण प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हे जेलची हवा खात आहेत. यावरून उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातसुद्धा त्यावेळी गाजलेल्या अनेक प्रकरणांची चर्चा रंगू लागली आहे. अभयारण्यातील श्रीनिवास नावाच्या या वाघाचा मृतदेह नागभीड तालुक्यातील एका शेतात आढळून आला होता. त्यामुळे ‘एक होता श्रीनिवास नावाचा वाघ’ अशी प्रतिक्रिया काही वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

आशिया खंडाचा सुपरस्टार असलेल्या जय नावाचा दमदार वाघसुद्धा श्रीनिवास रेड्डी सीसीएफ असतानाच अचानक गायब झाला होता. जयचे प्रेतही गवसले नाही. त्याचा पत्ता अद्यापही कोणतीही यंत्रणा लावू शकली नाही. यातच गोठणगाववाल्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला. या दोन बछड्यांपैकी एकाला श्रीनिवास तर दुसऱ्याला बिट्टू असे नामकरण केल्या गेले. श्रीनिवास आणि बिट्टू अशी जोडी त्यावेळी गाजली होती. शिवाय ‘फेअरी’ हे नावसुद्धा चर्चेत आले होते. फेअरी नावाची एक विदेशी तरुणी काही महिने या परिसरात जंगल सफारीसाठी आली असताना काही वन्यप्रेमींनी तिचे नाव देत तिलाही खुश केले. बड्या अधिकाऱ्यांशी जवळीकता साधण्यासाठी आणि आपली खासगी दलालीचे कामे उरकविण्यासाठी अधिकाऱ्यांचे नाव देण्याची शक्कल त्या काळात चांगलीच गाजली होती.

--

श्रीनिवास खड्ड्यात, बिट्टू जंगलात

जय आणि फेअरी यांच्या सहवासातून जन्मलेल्या श्रीनिवास आणि बिट्टू या दोघांपैकी श्रीनिवास नावाचा वाघ साधारणत: अडीच वर्षाचा असतानाच शेतातील एका खड्ड्यात पुरला गेला होता. विद्युत स्पर्शाने तो मृत्युमुखी पडला. शेतकऱ्याने शेतात प्रेत गाडले. व्हिडिओ कॉलर असल्याने ही घटना नागभीड तालुक्यात उघडकीस आली. दुसरीकडे बिट्टू नावाचा दुसरा वाघ नागभीड परिसरातील तळोधी शिवारातील जंगलात मोकळा श्वास घेत असल्याची माहिती आहे.

सखोल चौकशीची मागणी

१६ जून २०१६ हे जय वाघाचे अखेरचे लोकेशन होते. जय गायब झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतरच वन, वन्यजीव खाते खडबडून जागे झाले होते. विशेषत: यादरम्यान दीपाली चव्हाण प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे सीसीएफ म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात कर्तव्यावर होते. त्यामुळे या प्रकरणाचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

--

त्या काळात श्रीनिवास, बिट्टू, फेअरी असे नामकरण काहींच्या स्वार्थी हट्टामुळे केल्या गेले. ही बाब सत्य आहे. असे जरी असले तरी वन्यजीव विभागाशी या नामकरणाचा कवडीचाही संबंध नव्हता. वन्यजीव विभागाच्या दप्तरी सांकेतिक कोडचाच वापर केला जातो. त्यामुळे अशा नामकरणाला काहीही अर्थ राहत नाही.

सुहास बोकडे

वन्यप्रेमी, उमरेड