शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

दळवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 20:29 IST

देशातील दळणवळणाच्या क्षेत्राच्या विस्तार होत असून भविष्याची आवश्यकता लक्षात घेऊन यात झपाट्याने बदल होत आहे. देशातील वाहतुकीची गरज लक्षात घेता दळणवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. हे एकच ‘कार्ड’ रेल्वे, बस, मेट्रो, स्थानिक सार्वजनिक वाहतूक, टोल इत्यादी ठिकाणी वापरता येईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देनागपुरच्या ‘माझी मेट्रो’चे थाटात लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील दळणवळणाच्या क्षेत्राच्या विस्तार होत असून भविष्याची आवश्यकता लक्षात घेऊन यात झपाट्याने बदल होत आहे. देशातील वाहतुकीची गरज लक्षात घेता दळणवळणासाठी ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात येत आहे. हे एकच ‘कार्ड’ रेल्वे, बस, मेट्रो, स्थानिक सार्वजनिक वाहतूक, टोल इत्यादी ठिकाणी वापरता येईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.वर्धा रोडवरील ‘एअरपोर्ट साऊथ स्टेशन’वर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथून ‘मेट्रो’ला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्र, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. ‘एक देश, एक कार्ड’ प्रणाली फारच कमी देशात कार्यान्वित आहे. विविध शहरांमध्ये एकाच ‘कार्ड’च्या माध्यमातून प्रवास करता येईल. तसेच या ‘कॉमन मोबिलीटी कार्ड’च्या माध्यमातून खरेदीदेखील करता येणार आहे. ‘स्मार्ट’ व्यवस्थेच्या माध्यमातून विकासाला चालना देणारे ‘एक्सप्रेस कार्ड’ असेल. सामान्य जनतेची सुविधा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.संत्र्याप्रमाणे ‘माझी मेट्रो’ प्रसिद्ध होईलयावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात व शेवट मराठीतून केला. नागपुरची संत्री जशी जगप्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे ‘माझी मेट्रो’देखील नागपुरची ओळख बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०५० पर्यंत नागपुरची लोकसंख्या दुप्पट होईल. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था आधुनिक व्हायला हवी. यासाठी निरंतर प्रयत्नांची आवश्यकता आहे. नागपूरची ‘मेट्रो’ ही ‘ग्रीन मेट्रो’ ठरणार आहे. ‘मेट्रो’मुळे शहरांचा विस्तार होतो व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होते. नागपुरच्या रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होईल व प्रदुषणाची पातळीदेखील घटेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

२०१४ नंतर देशभरात ‘मेट्रो’च्या कामाला वेग२०१४ च्या अगोदर देशात ‘मेट्रो’चे ‘नेटवर्क’ २५० किमीचेच होते. मात्र ‘मजबूर’ ऐवजी ‘मजबूत’ सरकार आले आणि त्यानंतर हा आकडा ६५० किमीवर पोहोचला आहे. याशिवाय देशातील विविध भागात ८०० किमीच्या ‘मेट्रो’ मार्गांचे काम सुरू आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांना अप्रत्यक्षपणे चिमटे काढले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रो