शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दर दीड दिवसाला नागपूर शहरात एक बेवारस मृत्यू; २० टक्के मृत्यू अनैसर्गिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 08:00 IST

Nagpur News मागील काही काळापासून बेवारस मृतांचे प्रमाण वाढले असून, या वर्षी सहा महिन्यांतच सव्वाशेहून अधिक बेवारस मृत्यूंची नोंद झाली आहे. जर आकड्यांची गोळाबेरीज केली, तर नागपुरात दर दीड दिवसाला एक बेवारस मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे शासकीय रुग्णालयांपाठोपाठ बाजारपेठांत सर्वाधिक मृत्यू

योगेश पांडे

नागपूर : उन्हाळ्यात शहरातील तापमान उच्चांकावर पोहोचले असताना शहरात बऱ्याच जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. यात बेवारस मृतांचे प्रमाण अधिक होते. मागील काही काळापासून बेवारस मृतांचे प्रमाण वाढले असून, या वर्षी सहा महिन्यांतच सव्वाशेहून अधिक बेवारस मृत्यूंची नोंद झाली आहे. जर आकड्यांची गोळाबेरीज केली, तर नागपुरात दर दीड दिवसाला एक बेवारस मृत्यू झाला आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत नागपूर शहरात १३३ बेवारस मृतदेह आढळले. यांतील बहुतांश मृत्यू हे नैसर्गिक होते. मात्र २८ मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याची बाब शवविच्छेदनातून समोर आली होती. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण हे अत्यल्प होते व ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणच अधिक होते. या बेवारस मृतदेहांचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. नियमानुसार एखाद्या बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळल्यास पोलीस त्याची नोंद करतात.

२८ टक्के मृत्यू बाजारपेठांच्या परिसरात

नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार ३८.३४ टक्के मृत्यू मेयो, मेडिकल यांच्यासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये झाले; तर २८ टक्के मृत्यू हे शहरातील बाजारपेठांच्या परिसरात झाले. यात प्रामुख्याने सीताबर्डी, लकडगंज, सेंट्रल एव्हेन्यू, सक्करदरा या बाजारपेठांचा समावेश आहे. प्रामुख्याने या बाजारपेठांच्या परिसरात अनेक भटके लोक राहतात. तेथे अन्नपाणी सहजपणे मिळते व त्यामुळेच या ठिकाणी अशा लोकांचा वावर जास्त प्रमाणात असतो.

उष्माघाताचा सर्वाधिक फटका

रोजीरोटीच्या शोधात अनेकजण परराज्यांतून येतात; तर काहीजण कौटुंबिक कलहातून, तर काहीजण मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने घर सोडतात. शहरात आल्यावर हे लोक रेल्वेस्थानके, बसस्थानके, तर कित्येकदा रस्त्यावरच राहतात. त्यांना दोनवेळचे जेवण मिळणे शक्य नसते. रस्त्यावर राहिल्याने साथीच्या आजाराने अनेकांचा त्यात मृत्यू होतो. उन्हाळ्याच्या काळात गरमीमुळे अनेकांना उष्माघात होतो व त्यातच रस्त्यावर जीव जातो.

नातेवाइकांचा शोध घेणे कठीण

बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम पोलीस करतात. मात्र सतत बंदोबस्त आणि अन्य कारणांमुळे पोलिसांनाही त्या नातेवाइकांचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

 

टॅग्स :Deathमृत्यू