शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दर दीड दिवसाला नागपूर शहरात एक बेवारस मृत्यू; २० टक्के मृत्यू अनैसर्गिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 08:00 IST

Nagpur News मागील काही काळापासून बेवारस मृतांचे प्रमाण वाढले असून, या वर्षी सहा महिन्यांतच सव्वाशेहून अधिक बेवारस मृत्यूंची नोंद झाली आहे. जर आकड्यांची गोळाबेरीज केली, तर नागपुरात दर दीड दिवसाला एक बेवारस मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे शासकीय रुग्णालयांपाठोपाठ बाजारपेठांत सर्वाधिक मृत्यू

योगेश पांडे

नागपूर : उन्हाळ्यात शहरातील तापमान उच्चांकावर पोहोचले असताना शहरात बऱ्याच जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. यात बेवारस मृतांचे प्रमाण अधिक होते. मागील काही काळापासून बेवारस मृतांचे प्रमाण वाढले असून, या वर्षी सहा महिन्यांतच सव्वाशेहून अधिक बेवारस मृत्यूंची नोंद झाली आहे. जर आकड्यांची गोळाबेरीज केली, तर नागपुरात दर दीड दिवसाला एक बेवारस मृत्यू झाला आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत नागपूर शहरात १३३ बेवारस मृतदेह आढळले. यांतील बहुतांश मृत्यू हे नैसर्गिक होते. मात्र २८ मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्याची बाब शवविच्छेदनातून समोर आली होती. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण हे अत्यल्प होते व ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणच अधिक होते. या बेवारस मृतदेहांचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. नियमानुसार एखाद्या बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळल्यास पोलीस त्याची नोंद करतात.

२८ टक्के मृत्यू बाजारपेठांच्या परिसरात

नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार ३८.३४ टक्के मृत्यू मेयो, मेडिकल यांच्यासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये झाले; तर २८ टक्के मृत्यू हे शहरातील बाजारपेठांच्या परिसरात झाले. यात प्रामुख्याने सीताबर्डी, लकडगंज, सेंट्रल एव्हेन्यू, सक्करदरा या बाजारपेठांचा समावेश आहे. प्रामुख्याने या बाजारपेठांच्या परिसरात अनेक भटके लोक राहतात. तेथे अन्नपाणी सहजपणे मिळते व त्यामुळेच या ठिकाणी अशा लोकांचा वावर जास्त प्रमाणात असतो.

उष्माघाताचा सर्वाधिक फटका

रोजीरोटीच्या शोधात अनेकजण परराज्यांतून येतात; तर काहीजण कौटुंबिक कलहातून, तर काहीजण मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने घर सोडतात. शहरात आल्यावर हे लोक रेल्वेस्थानके, बसस्थानके, तर कित्येकदा रस्त्यावरच राहतात. त्यांना दोनवेळचे जेवण मिळणे शक्य नसते. रस्त्यावर राहिल्याने साथीच्या आजाराने अनेकांचा त्यात मृत्यू होतो. उन्हाळ्याच्या काळात गरमीमुळे अनेकांना उष्माघात होतो व त्यातच रस्त्यावर जीव जातो.

नातेवाइकांचा शोध घेणे कठीण

बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम पोलीस करतात. मात्र सतत बंदोबस्त आणि अन्य कारणांमुळे पोलिसांनाही त्या नातेवाइकांचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

 

टॅग्स :Deathमृत्यू