शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दिवाळीच्या दिवशी विजेच्या धक्क्याने आजाेबासह पाहुण्या नातवाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:10 IST

शेमडा शिवारातील घटना : सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नागपूर : दिवाळीनिमित्त पाहुणा म्हणून आलेला नातू आजाेबासाेबत शेतात गेला. मात्र, कुंपणाच्या तारेला स्पर्श झाल्याने दाेघांनाही विजेचा जाेरात धक्का लागला. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील शेमडा शिवारात दिवाळीच्या दिवशी (रविवार, दि. १२) दुपारी ३:३० ते सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणात सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

बारीकराम फदाली कडवे (८०, रा. शेमडा, ता. नरखेड) व तुषार अरुण डाेंगरे (९, रा. वडचिचाेली, ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृत आजाेबा व नातवाचे नाव आहे. तुषार हा बारीकराम यांच्या मुलीचा मुलगा असून, ताे त्याची आई व वडिलांसाेबत दिवाळीनिमित्त आजाेबाकडे पाहुणा म्हणून आला हाेता. आजाेबा शेतात जात असल्याने तुषारही त्यांच्यासाेबत शेतात गेला हाेता. अनावधानाने तुषारचा स्पर्श शेताच्या कुंपणाला लावलेल्या तारेला झाला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का बसला.

आजाेबाने त्याला पकडताच त्यांनाही जाेरात विजेचा धक्का लागला. दाेघेही काही वेळ शेताजवळ पडून हाेते. ते शेजारच्या शेतकऱ्याला दिसताच त्याने बारीकराम यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यामुळे ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी मृत तुषारचे मामा गजानन बारीकराम कडवे (२६) याच्या तक्रारीवरून मृत बारीकराम कडवे यांच्याविराेधात भादंवि ३०४ (सदाेष मनुष्यवध)अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार कृष्णकांत तिवारी यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक सारिका गुरुकर करीत आहेत.

वन्यप्राण्यांऐवजी घरच्या सदस्यांचा गेला जीव

शेमडा शिवारात अलीकडे वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते पिकांची नासाडी करीत असल्याने तसेच वारंवार मागणी करूनही वन विभाग वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करीत नाही. यात शेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुकसान हाेत असून, वन विभाग नुकसानभरपाईपाेटी त्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम ठेवतो. पिकाचे वन्यप्राण्यांपासून रक्षण व्हावे म्हणून बारीकराम कडवे यांनी शेताला तारांचे कुंपण तयार केले आणि त्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित केला हाेता. त्या वीजप्रवाहामुळे वन्यप्राण्यांऐवजी त्यांचा व नातवाचा जीव गेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर