शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मुंबई, पुण्यात ऑटोरिक्षा मीटरवर, नागपुरात का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:56 IST

दोन वर्षांपूर्वी भाड्यात दरवाढ, तरीही प्रवाशांची लुबाडणूक : कारवाईची मोहीम कोण हाती घेणार?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पुणे, मुंबईत ऑटोरिक्षा मीटरने धावत असताना नागपूरसारख्यामेट्रो शहरात ऑटोरिक्षाचे मीटर जामच आहे. विशेष म्हणजे, रिक्षाचे परमिट मिळविताना नागरिकांना मीटरप्रमाणे वाहतूक करण्याचा कायदा आहे. परंतु नागपुरात जवळपास ३७ हजारांच्या घरात असलेल्या ऑटोरिक्षा सर्रास मीटर बंद ठेवून प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वाहतूक विभागापासून ते परिवहन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ऑटोरिक्षा मीटरने चालावे यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा भाड्यामध्ये १६ जून २०२२ रोजी दरवाढ केली. या मागे पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, ऑटोरिक्षाचा विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर आदी कारणे देण्यात आली. भाडेवाढीच्या दृष्टीने ऑटोरिक्षांचे 'मीटर कॅलिब्रेशन' करण्यासाठी ६० दिवसांची मुदतही दिली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी होऊनही ऑटोचे मीटर जामच आहे. ऑटोरिक्षा मीटरने चालावे यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न होत नसल्याचे, शिवाय बहसंख्य प्रवासी तक्रारीही करीत नसल्याने ऑटोरिक्षा चालकांचे चांगलेच फावत आहे.

२०१४ मध्ये केली होती मीटरसक्ती नागपूर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा मीटरने चालावे यासाठी आरटीओकडून बरेच प्रयत्न झाले. २०१४ मध्ये मीटरनेच चालण्याची सक्तीही करण्यात आली. सुमारे ७०० ऑटोरिक्षांवर जप्तीची कारवाई झाली. या विरोधात ऑटोरिक्षा चालकांनी संपही पुकारला होता. मात्र, पुढे ही मोहीम थंडबस्त्यात गेली, २०२२ मध्ये प्राधिकरणाने प्रवासी भाड्यात दरवाढ करूनही ऑटो मीटरने चालण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याचे दिसून येते. आरटीओच्या तपासणीत एखादेवेळी मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षावर कारवाई होते, परंतु ती वरचेवर होत नाही. वाहतूक पोलिसही याला गंभीरतेने घेत नाही. त्यामुळे कारवाईचा धाक नसल्याचेही चित्र आहे. कारवाईची मोहीम कोण हाती घेणार, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

असे आहे मीटरचे भाडे नव्या टेरीफ कार्डनुसार प्रति कि. मी. करिता १८ रुपये भाडे तर १.५ कि.मी. करिता २७ रुपये भाडे आकारण्याचा नियम आहे. हे टेरीफ कार्ड ऑटोचालकांच्या फायद्याचे आहे. परंतु अनेक प्रवासी सीटनुसार प्रवास करण्यास अडून बसतात. यामुळे मीटर फक्त नावापुरतेच असल्याचे, ऑटोचालकांचे म्हणणे आहे.

मीटरला नकार दिल्यास १,५०० दंड मीटरनुसार चलण्यास नकार देणाऱ्या ऑटोचालकाच्या विरुद्ध तक्रार केल्यास आरटीओ १,५०० रुपये दंड ठोठावते. परंतु आरटीओकडे याविषयी तक्रारी नाहीत, यावरून शहरात मीटरविषयी जनजागृती नसल्याचा हा पुरवा आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाMetroमेट्रोnagpurनागपूर