शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लाखाेंच्या जनसागराचे तथागत बुद्ध व महामानवाला वंदन; दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2023 18:09 IST

उपराजधानीच्या रस्त्यावर निळा सागर

नागपूर : अद्भूत, अद्वितीय, अकल्पनीय अन् नि:शब्द करणारे चित्र मंगळवारी दीक्षाभूमीवर बघायला मिळाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धाचे धम्मचक्र गतीमान करून ६७ वर्षाचा काळ लाेटला पण त्या प्रवर्तनाचा उत्साह तसुभरही कमी झालेला दिसत नाही. कुणाचे निमंत्रण नाही की कशाचे आमिष नाही, केवळ त्या महामानवाबद्दल असलेला प्रचंड आदर व अभिमान बाळगत त्यांना नतमस्तक हाेण्यासाठी लाखाेंचा जनसागर ‘जय भीम’ चा जयघाेष करीत दीक्षाभूमीवर येताे. यावर्षीही लाखाे भीम अनुयायी तथागत बुद्ध व महामानवाला वंदन करण्यासाठी जगाच्या कानाकाेपऱ्यातून दीक्षाभूमीवर पाेहचली हाेती.

गेली दाेन दिवस दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर निळ्या महासागराने फुललेला हाेता. रेल्वे, बस, कार, टेम्पाे व मिळेल त्या साधनाने ही माणसे नागपूरला पाेहचली. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर गर्दीचा महापूर वाहत होता. उपराजधानीचे रस्ते या अनुयायांनी पायी चालतच माेजून काढले. मंगळवारी सकाळपासून मुख्य स्तुपात अभिवादन करण्यासाठी लाेकांची रांग लागली हाेती. रात्री मात्र या परिसरात गर्दी प्रचंड वाढली हाेती. ५ लाखांच्या वर जनसमुदायाने संपूर्ण दीक्षाभूमी व आसपासचे रस्ते भरून गेले. हातात पंचशील ध्वज, शुभ्र वस्त्र परिधान केलेले अनुयायी मुखात ‘जय भीम, जय बुद्ध’चा जयघाेष करीत दीक्षाभूमीवर पाेहचल्यावर ‘बुद्धम शरणम गच्छामी’च्या मंद स्वरात अभिवादन करीत हाेते.

३०० च्यावर पुस्तकांच्या स्टाॅलवर गर्दी.

दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती पुस्तकांची. येथे भाकरीची शिदाेरी आणणारे भीम अनुयायी परत जाताना ज्ञानरुपी पुस्तकांची शिदाेरी घेऊन घरी जातात, कारण त्यातच त्यांना महामानवाने दिलेला उन्नतीचा मार्ग सापडताे. यावेळीही पुस्तकांच्या स्टाॅलवर प्रचंड गर्दी दिसून आली. या परिसरात पुस्तकांचे ३०० च्यावर स्टाॅल लागले हाेते. शासकीय मुद्रणालय व बार्टीच्या स्टाॅलवर पुस्तके खरेदीसाठी लाेकांच्या रांगा लागल्या हाेत्या. माेबाईलच्या युगात पुस्तकांवर काेट्यवधीची उलाढाल हाेणारे कदाचित देशातील हे एकमेव स्थळ असेल.

सेवेसाठी सरसावले हजाराे हात

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना कुठलीही गैरसोय सहन करावी लागू नये यासाठी दरवर्षी र्शेकडाे संस्था, संघटनांचा सेवाभाव यावर्षीही तेवढ्याच प्रमाणिक पणे सुरू होता. दीक्षाभूमीच्या परिसरात आणि शहरात जागोजागी या संस्थांनी भोजनदान करून सेवाभाव जपला. दीक्षाभूमी परिसरातच ५० च्या जवळपास संस्थांच्या स्टॉलमध्ये भोजनदान व इतर खाद्यपदार्थांची साहित्य वितरीत करण्यात आली. तेवढ्याच संख्येने आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आदींची सेवा देण्यात आली. काहींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके व बौद्ध साहित्याचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थी व तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संस्था, संघटना सरसावल्या होत्या. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे बौद्ध विद्यार्थ्यांसोबतच देश-विदेशात नोकरी करणारे, उद्योग करणारे, शिक्षण घेणारे विद्यार्थी सेवा देण्यासाठी दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांसह विविध अभ्यासक्रम आणि व्यवसायविषयक मार्गदर्शन तरूणांना येथे मिळाले. त्यामुळे हा सोहळा धार्मिक स्थळाऐवजी ज्ञान प्रसाराचे केंद्र ठरले आहे.