शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लाखाेंच्या जनसागराचे तथागत बुद्ध व महामानवाला वंदन; दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2023 18:09 IST

उपराजधानीच्या रस्त्यावर निळा सागर

नागपूर : अद्भूत, अद्वितीय, अकल्पनीय अन् नि:शब्द करणारे चित्र मंगळवारी दीक्षाभूमीवर बघायला मिळाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धाचे धम्मचक्र गतीमान करून ६७ वर्षाचा काळ लाेटला पण त्या प्रवर्तनाचा उत्साह तसुभरही कमी झालेला दिसत नाही. कुणाचे निमंत्रण नाही की कशाचे आमिष नाही, केवळ त्या महामानवाबद्दल असलेला प्रचंड आदर व अभिमान बाळगत त्यांना नतमस्तक हाेण्यासाठी लाखाेंचा जनसागर ‘जय भीम’ चा जयघाेष करीत दीक्षाभूमीवर येताे. यावर्षीही लाखाे भीम अनुयायी तथागत बुद्ध व महामानवाला वंदन करण्यासाठी जगाच्या कानाकाेपऱ्यातून दीक्षाभूमीवर पाेहचली हाेती.

गेली दाेन दिवस दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर निळ्या महासागराने फुललेला हाेता. रेल्वे, बस, कार, टेम्पाे व मिळेल त्या साधनाने ही माणसे नागपूरला पाेहचली. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर गर्दीचा महापूर वाहत होता. उपराजधानीचे रस्ते या अनुयायांनी पायी चालतच माेजून काढले. मंगळवारी सकाळपासून मुख्य स्तुपात अभिवादन करण्यासाठी लाेकांची रांग लागली हाेती. रात्री मात्र या परिसरात गर्दी प्रचंड वाढली हाेती. ५ लाखांच्या वर जनसमुदायाने संपूर्ण दीक्षाभूमी व आसपासचे रस्ते भरून गेले. हातात पंचशील ध्वज, शुभ्र वस्त्र परिधान केलेले अनुयायी मुखात ‘जय भीम, जय बुद्ध’चा जयघाेष करीत दीक्षाभूमीवर पाेहचल्यावर ‘बुद्धम शरणम गच्छामी’च्या मंद स्वरात अभिवादन करीत हाेते.

३०० च्यावर पुस्तकांच्या स्टाॅलवर गर्दी.

दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती पुस्तकांची. येथे भाकरीची शिदाेरी आणणारे भीम अनुयायी परत जाताना ज्ञानरुपी पुस्तकांची शिदाेरी घेऊन घरी जातात, कारण त्यातच त्यांना महामानवाने दिलेला उन्नतीचा मार्ग सापडताे. यावेळीही पुस्तकांच्या स्टाॅलवर प्रचंड गर्दी दिसून आली. या परिसरात पुस्तकांचे ३०० च्यावर स्टाॅल लागले हाेते. शासकीय मुद्रणालय व बार्टीच्या स्टाॅलवर पुस्तके खरेदीसाठी लाेकांच्या रांगा लागल्या हाेत्या. माेबाईलच्या युगात पुस्तकांवर काेट्यवधीची उलाढाल हाेणारे कदाचित देशातील हे एकमेव स्थळ असेल.

सेवेसाठी सरसावले हजाराे हात

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना कुठलीही गैरसोय सहन करावी लागू नये यासाठी दरवर्षी र्शेकडाे संस्था, संघटनांचा सेवाभाव यावर्षीही तेवढ्याच प्रमाणिक पणे सुरू होता. दीक्षाभूमीच्या परिसरात आणि शहरात जागोजागी या संस्थांनी भोजनदान करून सेवाभाव जपला. दीक्षाभूमी परिसरातच ५० च्या जवळपास संस्थांच्या स्टॉलमध्ये भोजनदान व इतर खाद्यपदार्थांची साहित्य वितरीत करण्यात आली. तेवढ्याच संख्येने आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आदींची सेवा देण्यात आली. काहींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके व बौद्ध साहित्याचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थी व तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संस्था, संघटना सरसावल्या होत्या. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे बौद्ध विद्यार्थ्यांसोबतच देश-विदेशात नोकरी करणारे, उद्योग करणारे, शिक्षण घेणारे विद्यार्थी सेवा देण्यासाठी दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांसह विविध अभ्यासक्रम आणि व्यवसायविषयक मार्गदर्शन तरूणांना येथे मिळाले. त्यामुळे हा सोहळा धार्मिक स्थळाऐवजी ज्ञान प्रसाराचे केंद्र ठरले आहे.