शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation : ओबीसी-मराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:37 IST

Nagpur : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी व आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस गटाचे विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा समाजाला काय द्यायचे आहे ते सरकारने द्यावे त्याला आमचा विरोध नाही. शासनाने जीआरमध्ये पात्र शब्द पहिले प्रमाणे ठेवला असता तर आम्हाला विरोध नव्हता, पण सर्व भागातील मराठा समाज आता ओबीसीत येणार आहे. मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी व आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस गटाचे विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले हैदराबाद गॅझेटमध्ये ९ लाख कुणबी कोण आहे, हे कसे शोधावे... स्थानिक गावपातळीवर अधिकार दिला, कुठेही नावाचा उल्लेख नसल्याने हा सरसकटचा जीआर आहे, पात्र शब्द यातून वगळला आहे. त्यामुळे आमचा या जीआरला विरोध आहे. मराठा समाजात गरीब लोक आहेत. त्यांना दिले पाहिजे, त्यासाठी ईडब्ल्यूएसची तरतूद केली, ओबीसीची कॅप काढून जातीनिहाय संख्येनुसार देता येईल, तेलंगणा करू शकते, तसेही करता येईल, असा पर्यायही वडेट्टीवार यांनी सुचविला. 

ओबीसींची १२ रोजी बैठक

राज्यभरातील सर्व ओबीसी नेत्यांची दि. १२ सप्टेंबर रोजी नागपुरात बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी आपण स्वतः ओबीसी नेत्यांना फोन केले. साधारण १५० ओबीसी नेते उपस्थित राहतील, पक्षाचा पलीकडे जाऊन ओबीसी हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वांना येण्याची विनंती केली. सरकारने जीआर काढला त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत. मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनाही बैठकीसाठी निरोप दिला आहे, भुजबळ यांच्याशी मी स्वतः संपर्क केला.. पण, माझा संपर्क झाला नाही. ऑफिसचा संपर्क झाला असेल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

डॉ. तायवाडे यांची भूमिका बदललेली

मंत्री छगन भुजबळ यांच्या मताशी आम्ही भूमिकेशी सहमत आहोत. ओबीसीचे नुकसान होत आहे. पण काँग्रेस नेते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची भूमिका पूर्वी होती ती आता दिसत नाही, ते कुठल्या चषयातून बघतात ते त्यांना माहीत. पुढे येणाऱ्या दिवसात सत्य परिस्थिती लक्षात येईल. तायवाडे यांची भूमिका स्पष्ट नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. सरकारने बोलाविलेल्या ओबीसींच्या बैठकीला आपल्याला बोलाविण्यात आले नाही. कदाचित सरकारला पाठबळ देणाऱ्या संघटनांना बोलावले असेल, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणnagpurनागपूर