शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची संख्या अर्ध्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:41 IST

दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला सर्वाधिक फटका ईशान्येकडील राज्यांचे पुरस्कार वाढले

बालाजी देवर्जनकरनागपूर : दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. पूर्वी पावणेचारशे शिक्षक या पुरस्काराने गौरविले जात होते. आता मात्र ही संख्या दीडशेपेक्षाही कमी होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला २९ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जायचे. आता नव्या निकषानुसार राज्याच्या वाट्याला केवळ ६ पुरस्कार येणार आहेत. पुरस्कारसंख्या घटविल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाने नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात अनेक फेरबदल केले असून आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यासह काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या ११ मोठ्या राज्यांना प्रत्येकी ६ पुरस्कार दिले जातील. तर आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालंड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या १८ राज्यांना प्रत्येकी ३ पुरस्कार दिले जातील. केंद्रशासित प्रदेशामध्ये केवळ दिल्लीला दोन तर उर्वरित अंदमान निकोबार, चंडीगड, दादरा नगर हवेली, दीव दमण, लक्षद्वीप, पुडुचेरीना प्रत्येकी १ एक पुरस्कार मिळेल. केंद्र सरकारद्वारे संचालित केंद्रीय व नवोदय विद्यालय, सीबीएससी शाळांना १७ पुरस्कार दिले जाणार आहेत. असे एकूण १४५ पुरस्कारांचे वितरण केंद्र सरकार या शिक्षक दिनापासून करणार आहे. पूर्वीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. गतवर्षीपर्यंत देशातील ३७८ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केले जायचे. आता ही संख्या अर्ध्यापेक्षा खाली आल्याने देशातील तब्बल २३३ शिक्षकांना पुरस्कारांपासून मुकावे लागणार आहे.सध्या पुरस्कार संख्येत झालेले बदल हे छोट्या राज्यांच्या पथ्यावर पडले असून, मोठ्या राज्यांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. गोवासह अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना पूर्वीपेक्षा प्रत्येकी एक पुरस्कार वाढवून मिळणार आहे. महाराष्ट्र २३, उत्तर प्रदेश २२, पश्चिम बंगाल २०, तामिळनाडू १९, आंध्रप्रदेश १५, गुजरात, केरळ १०, कर्नाटक ९, मध्यप्रदेश, राजस्थान ८, आसाम, हरयाणा, ओरिसा, उत्तराखंड ५, छत्तीसगड, पंजाब ५, बिहार ३, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड १ असे पुरस्कार कमी झाले आहेत. त्यामुळे ८ राज्यांना प्रत्येकी एक पुरस्काराचा फायदा झाला असला तरी २१ राज्यांचे १७५ पुरस्कार मात्र हिरावून घेतले आहेत.पहिल्यांदाच घटली पुरस्काराची संख्या१९५८-५९ सालापासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जातात. त्यात १९६७-६८, १९७६, १९९३, २०००-०१, २००७, २०१४मध्ये अनेक बदल झाले आहेत. पण आतापर्यंत झालेले बदल हे पुरस्कारांच्या संख्येत किंवा पुरस्कार राशी वाढविण्यासाठी झाले आहेत. या वर्षी होवू घातलेले बदल पहिल्यांदा पुरस्कारांची संख्या कमी करण्यासाठी होत आहेत.मानव संसाधन विकास मंत्री महाराष्ट्राचे असताना...सध्या केंद्रात मानव संसाधन विकासमंत्री महाराष्ट्राचे प्रकाश जावडेकर आहेत. केंद्रात महाराष्ट्रीयन व्यक्ती मंत्री असतानाच महाराष्ट्रील सर्वाधिक पुरस्कार कमी व्हावेत, याबाबत शिक्षण वतुर्ळातून आश्चर्यासह संतापही व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक