शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

जिल्ह्यातील जीवघेण्या अपघातांचे प्रमाण गंभीर; जीव वाचविण्यासाठी पोलिसांचा जीवनदायी उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 00:02 IST

अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत.

नागपूर- जिल्ह्यात अनेक महामार्ग असून, गावोगावचे रस्तेही चांगले आहेत. त्यामुळे जीवघेण्या अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. हे अपघात कमी करून निरपराध्यांचे सोन्यासारखे जीव वाचविण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत, असे मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मगर यांनी पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून एक महिना झाला आहे. या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील गुन्हे, गुन्हेगारीचे स्वरूप आणि पोलिसांच्या उपाय योजना या संबंधाने लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी आज चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारी नियंत्रित करणे, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम राखणे, दोषसिद्धता वाढविणे, ही पोलिसांची जबाबदारीच आहे. ती आम्ही पार पाडणारच आहोत.याच बरोबर दोष नसताना दुसऱ्याच्या चुकीमुळे होणाऱ्या अपघातात निरपराधांना आपला जीव गमवावा लागतो. नागपूर जिल्ह्यात जीवघेण्या अपघाताची संख्या चिंताजनक आहे. २०२० मध्ये झालेल्या २३१ अपघातांत २४४ जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारी ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत ३१९ अपघातांत ३३५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश तरुण होते. अपघातात एखाद्याचा बळी जात असला, तरी त्याच्या मृत्युमुळे ते संपूर्ण कुटुंबच विस्कळीत होते. आयुष्यभर न भरून निघणारी हानी त्या कुटुंबाची होत असते. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील जीवघेणे अपघात कमी करण्याला आपण सर्वोत्तम प्राधान्य देणार असल्याचे मगर म्हणाले.

स्वतंत्र पोलीस पथके तयार करणार -अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत. या पथकांकडे फक्त अपघात रोखण्याचीच जबाबदारी राहणार आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताचे स्थळ (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून तेथे आवश्यक उपाययोजना केल्या जाईल. या जीवनदायिनी उपक्रमासाठी हायवे पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेची मदत घेणार आहोत. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्टेट हायवे पोलीस) डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी आपली चर्चा झाली असून, या उपक्रमाला आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळणार आहे.

जिल्हा परिषदेची मदत घेणार -जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी ग्रामसुरक्षा दलाच्या धर्तीवर वेगवेगळी पथके तयार करून त्यांना या उपक्रमात जोडण्याचा विचार आहे. या पथकांकडून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली जाईलच. मात्र, अपघातच होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यायची, या संबंधीचे जनजागरण आम्ही करणार आहोत. या उपक्रमातून गावोगावचे सोन्यासारखे जीव वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यात आम्हाला सर्वांची साथ आणि यश मिळेल, असा विश्वासही विजयकुमार मगर यांनी व्यक्त केला.

महिला-मुलींसंबंधीचे गुन्हे रोखणारमहिला-मुलींसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठीही ग्रामीण पोलीस प्राधान्याने प्रयत्न करतील. १३ ते १८ या वयोगटांतील मुली बेपत्ता होण्याचे (पळून जाण्याचे) प्रमाण लक्षणीय आहे. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, या वयातील मुलींसाठी शाळा-महाविद्यालयात महिला पोलिसांची स्वतंत्र पथके समुपदेशन वर्ग घेऊन त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची जाण व्हावी, धोके कळावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. स्त्री असो, मुलगी असो अथवा मुलगा. तो जर सतर्क असेल, तर गुन्हा घडत नाही. यासाठी प्रत्येकाला सतर्क करण्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस