शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

आता घराची भिंतही रेडीमेड : वॉल पॅनल आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:15 IST

तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.

ठळक मुद्देरेती- सिमेंट-विटांचा खर्च आणि वेळेची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.भारतीय रस्ते परिषदेच्या तांत्रिक प्रदर्शनात असलेल्या इको स्मार्ट वॉल पॅनलच्या स्टॉलवर या रेडीमेड भिंती पाहता येतात. याचे संचालक वरुण सचदेवा यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, फ्लाय अ‍ॅश आणि सिमेंटने हे पॅनल वॉल तयार केले जातात. ते आपसात जोडून भिंत उभारली जाते. या भिंती हलक्या आणि मजबूत आहे. यामुळे रेती, सिमेंट आणि विटांचा खर्च वाचतो. प्लास्टर करायची गरज नाही. पुटिंग करून किंवा थेट रंगही मारता येतो. एकूण घराच्या बांधकामात तब्बल २० टक्के खर्च अशा भिंतींमुळे वाचतो. शिवाय या भिंती चार इंचीच्या असल्याने जागाही भरपूर उपलब्ध होते. त्यामुळे या भिंती आता काळाची गरज ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग 

भारतीय रस्ते परिषदेसाठी नागपुरात देशभरातील रस्ते बांधणारे अभियंते सहभागी झाले आहेत. ते रस्ते बांधणीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आले आहेत. या तंत्रज्ञानातून रस्ते अधिक दर्जेदार आणि सुविधाजनक कसे करता येतील, यावर ते चर्चा करीत आहेत. या सर्वांदरम्यान मानकापूर स्टेडिमला लागून असलेला ‘सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा देखावा हा मार्गदर्शन ठरणारा आहे.दिलीप चिंचमलातपुरे यांनी हा देखावा तयार केला आहे. सुरुवातीला फुलझाडांनी युक्त असे हे सौंदर्यीकरण असल्याचा भास होतो. परंतु त्याच्या मागे त्यांचा एक विचार आहे. येथे डोंगराळ भागात रस्ते बांधताना पूर्ण डोंगर कापण्याची गरज नाही. केवळ रस्त्यापुरते डोंगर कापा. परिसरात झाडे लावा, तलाव तयार करा. तलावाची माती रस्त्यांसाठी वापरा. डोंगरातून पाणी झिरपून तलावात साचेल. त्यामुळे वर्षभर पाणी राहील. ते लोकांना उपलब्ध होईल. तलावात मासेमारी केल्याने रोजगारही मिळेल, असा एकूण संदेश देणारा हा देखावा मार्गदर्शक ठरला आहे.