शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

आता घराची भिंतही रेडीमेड : वॉल पॅनल आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:15 IST

तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.

ठळक मुद्देरेती- सिमेंट-विटांचा खर्च आणि वेळेची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.भारतीय रस्ते परिषदेच्या तांत्रिक प्रदर्शनात असलेल्या इको स्मार्ट वॉल पॅनलच्या स्टॉलवर या रेडीमेड भिंती पाहता येतात. याचे संचालक वरुण सचदेवा यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, फ्लाय अ‍ॅश आणि सिमेंटने हे पॅनल वॉल तयार केले जातात. ते आपसात जोडून भिंत उभारली जाते. या भिंती हलक्या आणि मजबूत आहे. यामुळे रेती, सिमेंट आणि विटांचा खर्च वाचतो. प्लास्टर करायची गरज नाही. पुटिंग करून किंवा थेट रंगही मारता येतो. एकूण घराच्या बांधकामात तब्बल २० टक्के खर्च अशा भिंतींमुळे वाचतो. शिवाय या भिंती चार इंचीच्या असल्याने जागाही भरपूर उपलब्ध होते. त्यामुळे या भिंती आता काळाची गरज ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग 

भारतीय रस्ते परिषदेसाठी नागपुरात देशभरातील रस्ते बांधणारे अभियंते सहभागी झाले आहेत. ते रस्ते बांधणीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आले आहेत. या तंत्रज्ञानातून रस्ते अधिक दर्जेदार आणि सुविधाजनक कसे करता येतील, यावर ते चर्चा करीत आहेत. या सर्वांदरम्यान मानकापूर स्टेडिमला लागून असलेला ‘सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा देखावा हा मार्गदर्शन ठरणारा आहे.दिलीप चिंचमलातपुरे यांनी हा देखावा तयार केला आहे. सुरुवातीला फुलझाडांनी युक्त असे हे सौंदर्यीकरण असल्याचा भास होतो. परंतु त्याच्या मागे त्यांचा एक विचार आहे. येथे डोंगराळ भागात रस्ते बांधताना पूर्ण डोंगर कापण्याची गरज नाही. केवळ रस्त्यापुरते डोंगर कापा. परिसरात झाडे लावा, तलाव तयार करा. तलावाची माती रस्त्यांसाठी वापरा. डोंगरातून पाणी झिरपून तलावात साचेल. त्यामुळे वर्षभर पाणी राहील. ते लोकांना उपलब्ध होईल. तलावात मासेमारी केल्याने रोजगारही मिळेल, असा एकूण संदेश देणारा हा देखावा मार्गदर्शक ठरला आहे.