शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबरअखेरीस येणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 28, 2023 21:55 IST

Nagpur: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे.

- मोरेश्वर मानापुरे 

नागपूर-  टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. केवळ आठवड्यातच २० रुपये किलोची वाढ झाली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. 

नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता ठोक व्यापारी गौरव हरडे यांनी व्यक्त केली. वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.

दक्षिण भारतातून कांद्याची आवकसध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेश राज्यातून कांद्याची आवक सुरू आहे. पूर्वी दररोज होणारी २५ ट्रकची आवक आता १० ट्रकपर्यंत (एक ट्रक १८ टन) कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत. ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ५० ते ६० रुपये आहेत. पुढे भाव स्थिर राहतील वा वाढतील, यावर आता भाष्य करणे कठीण आहे. भावपातळी केवळ पुरवठ्यावर अवलंबून राहील. 

दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात पुरवठासध्या कांदे दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात विक्रीसाठी जात आहेत. त्यामुळेच सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा आठवड्यापासून आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. पांढरे कांदे केवळ बेळगांव येथे आहेत. जागेवरच ७० रुपये किलो भाव आहे. त्यामुळे पांढरे कांदे कळमन्यात विक्रीसाठी बोलविण्याची कुणीही हिंमत करीत नाही.

डिसेंबरच्या प्रारंभी येणार नवीन कांदेजळगाव, जामोद, धुळे, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मराठवाडा येथील कांदे नोव्हेंबरअखेर वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी कळमन्यात उपलब्ध होतील. त्यावेळी कांद्याचा दर्जा कसा राहील, हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. महाराष्ट्रातील नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होतील. ग्राहकांना एक ते सव्वा महिना जास्त दरातच खरेदी करावे लागतील. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. त्यानंतरही कांद्याची टंचाई दिसणार नाही, असे व्यापारी म्हणाले.

जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे पीक नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कळमन्यात येईल. गुजरातेतील कांदा जानेवारीत महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आवक वाढल्यानंतरच भाव कमी होतील.-  गौरव हरडे(अध्यक्ष, कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशन)

टॅग्स :onionकांदाInflationमहागाईnagpurनागपूर