शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबरअखेरीस येणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 28, 2023 21:55 IST

Nagpur: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे.

- मोरेश्वर मानापुरे 

नागपूर-  टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. केवळ आठवड्यातच २० रुपये किलोची वाढ झाली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. 

नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता ठोक व्यापारी गौरव हरडे यांनी व्यक्त केली. वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.

दक्षिण भारतातून कांद्याची आवकसध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेश राज्यातून कांद्याची आवक सुरू आहे. पूर्वी दररोज होणारी २५ ट्रकची आवक आता १० ट्रकपर्यंत (एक ट्रक १८ टन) कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत. ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ५० ते ६० रुपये आहेत. पुढे भाव स्थिर राहतील वा वाढतील, यावर आता भाष्य करणे कठीण आहे. भावपातळी केवळ पुरवठ्यावर अवलंबून राहील. 

दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात पुरवठासध्या कांदे दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात विक्रीसाठी जात आहेत. त्यामुळेच सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा आठवड्यापासून आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. पांढरे कांदे केवळ बेळगांव येथे आहेत. जागेवरच ७० रुपये किलो भाव आहे. त्यामुळे पांढरे कांदे कळमन्यात विक्रीसाठी बोलविण्याची कुणीही हिंमत करीत नाही.

डिसेंबरच्या प्रारंभी येणार नवीन कांदेजळगाव, जामोद, धुळे, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मराठवाडा येथील कांदे नोव्हेंबरअखेर वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी कळमन्यात उपलब्ध होतील. त्यावेळी कांद्याचा दर्जा कसा राहील, हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. महाराष्ट्रातील नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होतील. ग्राहकांना एक ते सव्वा महिना जास्त दरातच खरेदी करावे लागतील. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. त्यानंतरही कांद्याची टंचाई दिसणार नाही, असे व्यापारी म्हणाले.

जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे पीक नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कळमन्यात येईल. गुजरातेतील कांदा जानेवारीत महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आवक वाढल्यानंतरच भाव कमी होतील.-  गौरव हरडे(अध्यक्ष, कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशन)

टॅग्स :onionकांदाInflationमहागाईnagpurनागपूर