शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबरअखेरीस येणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 28, 2023 21:55 IST

Nagpur: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे.

- मोरेश्वर मानापुरे 

नागपूर-  टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. केवळ आठवड्यातच २० रुपये किलोची वाढ झाली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. 

नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता ठोक व्यापारी गौरव हरडे यांनी व्यक्त केली. वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.

दक्षिण भारतातून कांद्याची आवकसध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेश राज्यातून कांद्याची आवक सुरू आहे. पूर्वी दररोज होणारी २५ ट्रकची आवक आता १० ट्रकपर्यंत (एक ट्रक १८ टन) कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत. ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ५० ते ६० रुपये आहेत. पुढे भाव स्थिर राहतील वा वाढतील, यावर आता भाष्य करणे कठीण आहे. भावपातळी केवळ पुरवठ्यावर अवलंबून राहील. 

दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात पुरवठासध्या कांदे दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात विक्रीसाठी जात आहेत. त्यामुळेच सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा आठवड्यापासून आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. पांढरे कांदे केवळ बेळगांव येथे आहेत. जागेवरच ७० रुपये किलो भाव आहे. त्यामुळे पांढरे कांदे कळमन्यात विक्रीसाठी बोलविण्याची कुणीही हिंमत करीत नाही.

डिसेंबरच्या प्रारंभी येणार नवीन कांदेजळगाव, जामोद, धुळे, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मराठवाडा येथील कांदे नोव्हेंबरअखेर वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी कळमन्यात उपलब्ध होतील. त्यावेळी कांद्याचा दर्जा कसा राहील, हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. महाराष्ट्रातील नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होतील. ग्राहकांना एक ते सव्वा महिना जास्त दरातच खरेदी करावे लागतील. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. त्यानंतरही कांद्याची टंचाई दिसणार नाही, असे व्यापारी म्हणाले.

जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे पीक नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कळमन्यात येईल. गुजरातेतील कांदा जानेवारीत महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आवक वाढल्यानंतरच भाव कमी होतील.-  गौरव हरडे(अध्यक्ष, कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशन)

टॅग्स :onionकांदाInflationमहागाईnagpurनागपूर