शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपुरात हिवाळी नव्हे पावसाळी अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:11 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे संकेत : काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सध्यातरी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. हा धागा धरीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत या मुद्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपुरात हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन घ्यावे, असा कामकाज सल्लागार समितीमध्ये आपला प्रस्ताव आहे. बैठकीत त्यावर चर्चा होईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. जुलैमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस असतो. अनेक प्रश्न उद्भवतात. शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनानंंतर होणारे अधिवेशन नागपुरात झाले तर त्याचा विदर्भाला फायदाच होईल, असेही त्यांनी सांगितले. स्वत: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव असल्यामुळे आता गुलाबी थंडीत नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन इतिहासजमा होऊन पावसाळी अधिवेशनात सरकार नागपुरात दाखल होईल, हे निश्चित मानले जात आहे.दरम्यान, नागपुरात जुलैमध्ये अधिवेशन घेण्यावरून काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशन जुलैमध्ये घेण्यास काहीही हरकत नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण होणारे अधिवेशन हे चार ते सहा आठवड्याचे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन जुलैमध्ये घेण्यास विरोध केला. जुलैमध्ये शेतकऱ्यांचा हंगाम असतो. पीक निघाले नसते. त्यामुळे शेतमालाला मिळणारे भाव, पिकांचे होणारे नुकसान याचा कुठलाही अंदाज आलेला नसतो. शेतकऱ्यांचे प्रश्न या काळात समोर आलेले नसतात, असेही त्यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढण्याचा सरकारने मार्ग शोधला आहे. जुलैमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येत नाही. त्यामुळे जुलैचे अधिवेशन नागपुरात घेऊन शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळणार नाही. आ. विजय वडेट्टीवारउपनेते, काँग्रेस

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७nagpurनागपूर