शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:13 AM

स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणांचा संकल्पनागपुरात ठरली व्यूहरचना

नरेश डोंगरे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : कानून के हात बहोत लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. यापुढे आता कानून के हात लंबे आणि खूप सारे असणार आहे. होय, स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे. या एकत्रित हाताच्या बळकटीतून नक्षल चळवळीची मानगूट आवळण्याची व्यूहरचना शुक्रवारी नागपुरात आयोजित विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.भारतातील अनेक राज्याच्या सुरक्षा यंत्रणांपुढे नक्षलवाद डोकेदुखीचाच विषय आहे. राज्याच्या राजधानीच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती १९८२ ला झाली. निसर्गाने वनवैभवाची, खनिजाची गडचिरोली-गोंदियावर मुक्त उधळण केली आहे. मात्र, नक्षल्यांनी या जिल्ह्याच्या विकासाला अशी काही उधळी लावली की येथील जनजीवन प्रचंड दहशतीत आले. नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या हिंसक घटना घडवून ३५ वर्षांत पोलीस खबरे असल्याच्या संशयावरून ४७४ सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या. वेळोवेळी घातपात घडवून १९१ पोलिसांचे जीव घेतले. कर्तव्यावर असलेल्या ५११ पोलिसांना जीवघेण्या जखमा दिल्या. पोलिसांसोबत विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या २० जणांना क्रूरपणे मारले. तोडफोड, जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी आतापर्यंत २९ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले. हे केवळ एकट्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भयावह चित्र आहे. असेच किंवा याहीपेक्षा भयावह चित्र छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये आहे. अबूझमाड, दंतेवाडा हे परिसर नक्षल्यांच्या गुहा मानल्या जातात. नक्षलवादाचा साप कधी अन् कुठे वळवळेल आणि कुणाचा बळी घेईल, याचा काहीच नेम नाही. केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त राज्य सरकार आपापल्या परीने तीन दशकांपासून नक्षलवादाविरोधात झुंजत आहे. मात्र, नक्षलवाद संपण्याऐवजी वाढतच आहे. अलीकडे नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा फायदा झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह अनेक भागातील नक्षलवाद बॅकफूटवर आहे. त्याला तसाच मागे सारण्यासाठी विविध राज्यातील पोलिसांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ), आयटीबीपीचेही पाठबळ मिळाले आहे. या सर्वांनी मिळून नक्षलवादाविरुद्ध एक नवी आक्रमक ‘आॅपरेशन’ची तयारी चालवली आहे.त्यासाठी येथील नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ) सुराबर्डीतील केंद्रात शुक्रवारी विविध राज्यातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, एएनओचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) डी. कनकरत्नम, बालाघाटचे एडीजी श्री जनार्धन त्याचप्रमाणे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील २८ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. वरिष्ठांच्या आदेशावरून एएनओचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. एका राज्यात घातपात करून बाजूच्या राज्यात पळून जायचे. तेथे काही दिवस थांबल्यानंतर तेथील नक्षल्यांकडून घातपात करवून पुन्हा दुसऱ्या राज्यात पळून जायची नक्षली नेत्यांची क्लृप्ती यापुढे चालू द्यायची नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.नेते अन रसद पुरविणाऱ्यांवर नजरविविध राज्यातील शिर्षस्थ नक्षली नेते, दलम कमांडर आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची, त्यांच्या कार्यपद्धतीची बारीकसारीक माहिती एक दुसऱ्यांना पुरवून नक्षल्यांचे कटकारस्थान उधळून लावण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. नक्षल्यांना रसद पुरविणाऱ्यांवर कडक नजर ठेवतानाच नक्षली नेते, फ्रंटल आॅर्गनायझेशनवरही सूक्ष्म नजर ठेवून नक्षल चळवळीची मानगूट पकडण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला.सुरक्षा यंत्रणांच्या या बळकट एकत्रीकरणातून भविष्यात चांगले परिणाम बघायला मिळेल,असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद