शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

आता चण्यावर ६० टक्के आयात शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:45 PM

केंद्र सरकारने होळीच्या एक दिवसाआधी चण्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते ६० टक्क्यांवर नेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देविक्रमी उत्पादन, शेतकऱ्यांना फायदा : केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने होळीच्या एक दिवसाआधी चण्यावरील आयात शुल्कात वाढ करून ते ६० टक्क्यांवर नेले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या चण्याची आधारभूत किंमत ४,४०० रुपये आहे. पण बाजारपेठेत प्रति क्विंटल ३,९०० रुपयात विक्री सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा व्हायचा.द होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, सरकारचा आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय योग्य, स्वागतार्ह आणि शेतकऱ्यांचा हितार्थ आहे. १५ मार्चपासून राज्य सरकार शेतकऱ्यांपासून ४,४०० रुपये क्विंटल दराने चण्याची खरेदी करणार आहे. यंदा देशात चण्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे केंद्र सरकारने विदेशातून चण्याची आयात पूर्णपणे थांबवावी. याच कारणांमुळे केंद्र सरकार आयात शुल्कात निरंतर वाढ करीत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये मसूरसोबतच चण्यावर ३० टक्के आयात शुल्क आकारले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यात वाढ करून ४० टक्क्यांवर नेले. आता आणखी २० टक्के वाढवून ६० टक्के केले आहे. घरगुती बाजारात चण्याचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी झाल्यामुळे सरकार चिंतित होती. नवीन पीक कापण्याची तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांत कापणीचा वेग वाढल्यानंतर चण्याच्या किमतीवर दबाव आणखी वाढणार आहे.केंद्राच्या निर्णयामुळे आॅस्ट्रेलिया आणि अन्य देशांतून स्वस्त किमतीतील चण्याची आयात थांबेल आणि त्यामुळे बाजारात किमती स्थिर राहतील. केंद्राने काबुली चण्याच्या आयातीवर ४० टक्के आयात शुल्क लावले आहे. यावर्षी चण्याचे उत्पादन विक्रमी १११ लाख टनावर जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कमी होतील, पण आयात शुल्क वाढविल्यामुळे भाव स्थिर राहतील. सन २०१६-१७ मध्ये ९३.५० लाख टन उत्पादन झाले होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. आयात शुल्कवाढीचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMarketबाजार