शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 13:14 IST

राज्य सरकार बांधणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकाआधी माझे शब्दस्मारक येणार असल्याचे प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले.

नागपूर : राज्य सरकार शिवरायांचे स्मारक उभारणार आहे. मात्र त्यांचे स्मारक व्हायचे तेव्हा होईल, त्यापूर्वीच आपले शब्दस्मारक आलेले असेल, असा विश्वास प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

नागपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपल्या महासम्राट या कादंबरीमालेची माहिती दिली. ते म्हणाले, महासम्राट ही कादंबरीमाला चार खंडांची असेल. त्यातील पहिला खंड ‘झंझावात’ लवकरच वाचकांपुढे येत आहे. यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचे कथानक अर्थात शहाजीराजे यांच्या जीवनकार्याचा पट आहे. दुसरा खंड ‘रणखैंदळ’ या नावाने असून, १६६१ ते १६६४ त्यात शिवरायांच्या बालपणातील चार वर्षांचा काळ उभा केला आहे. आपल्या साहित्यकृतीवर वाचकांनी नितांत प्रेम केले आहे. याचेही ते स्वागत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवराय समजायचे असतील तर पिता, माता आणि शिवराय या त्रिकुटाला समजून घेतल्याशिवाय ते कळणार नाही. शूर असलेल्या शहाजीराजांनी भातोडीमध्ये १६२४ मध्ये पहिले गनिमीकाव्याचे युद्ध केले. एक लाख सैन्याविरुद्ध ते अवघे ४० हजारांचे सैन्य घेऊन येथील निसर्ग, दऱ्या, डोंगर, माती, भौगोलिक आणि नैसर्गिक स्थितीचा आधार घेऊन गनिमीकाव्याने लढले. तोच मार्ग शिवरायांनी अनुसरला. माता जिजाऊंनी शिवराय उदरात असताना जे दिवस भोगले, अवघ्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंना भर पावसात आश्रयासाठी फिरावे लागले, हा सर्व इतिहास कुठेच दिसत नाही.

पोर्तुगीजांच्या पत्रातून तो उघड होतो. हे लेखन करण्यासाठी आपण त्या सर्व ऐतिहासिक साहित्याचे अध्ययन केले. २५० किल्ले स्वत: पाहिले. अनेकदा भ्रमंती केली. शिवरायांकडे आपण केवळ चरित्रनायक म्हणून पाहात नाही; तर त्यांच्या संपूर्ण चळवळीचे आयुष्य यावे, त्यांचे अष्टावधानी रूप निखळपणे पुढे यावे, हा आपला हेतू आहे. आपली लेखनी वाहवत जाणार नाही. राजकीय फायद्यापोटी किंवा जातीय अभिमानापोटी आपण हे साहित्य निर्मिले नाही, तर लेखकाने सच्चा इतिहास मांडावा, ही आपली त्यामागील भावना आहे. शिवरायांचे विराट स्वरूप सांगणे गरजेचे होते. त्यामुळे ही कादंबरी चार खंडांत येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला केशव-कृष्ण फाैंडेशनचे राजा भोयर उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यVishwash Patilविश्वास पाटील Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज