शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 13:14 IST

राज्य सरकार बांधणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकाआधी माझे शब्दस्मारक येणार असल्याचे प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले.

नागपूर : राज्य सरकार शिवरायांचे स्मारक उभारणार आहे. मात्र त्यांचे स्मारक व्हायचे तेव्हा होईल, त्यापूर्वीच आपले शब्दस्मारक आलेले असेल, असा विश्वास प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

नागपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपल्या महासम्राट या कादंबरीमालेची माहिती दिली. ते म्हणाले, महासम्राट ही कादंबरीमाला चार खंडांची असेल. त्यातील पहिला खंड ‘झंझावात’ लवकरच वाचकांपुढे येत आहे. यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचे कथानक अर्थात शहाजीराजे यांच्या जीवनकार्याचा पट आहे. दुसरा खंड ‘रणखैंदळ’ या नावाने असून, १६६१ ते १६६४ त्यात शिवरायांच्या बालपणातील चार वर्षांचा काळ उभा केला आहे. आपल्या साहित्यकृतीवर वाचकांनी नितांत प्रेम केले आहे. याचेही ते स्वागत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवराय समजायचे असतील तर पिता, माता आणि शिवराय या त्रिकुटाला समजून घेतल्याशिवाय ते कळणार नाही. शूर असलेल्या शहाजीराजांनी भातोडीमध्ये १६२४ मध्ये पहिले गनिमीकाव्याचे युद्ध केले. एक लाख सैन्याविरुद्ध ते अवघे ४० हजारांचे सैन्य घेऊन येथील निसर्ग, दऱ्या, डोंगर, माती, भौगोलिक आणि नैसर्गिक स्थितीचा आधार घेऊन गनिमीकाव्याने लढले. तोच मार्ग शिवरायांनी अनुसरला. माता जिजाऊंनी शिवराय उदरात असताना जे दिवस भोगले, अवघ्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंना भर पावसात आश्रयासाठी फिरावे लागले, हा सर्व इतिहास कुठेच दिसत नाही.

पोर्तुगीजांच्या पत्रातून तो उघड होतो. हे लेखन करण्यासाठी आपण त्या सर्व ऐतिहासिक साहित्याचे अध्ययन केले. २५० किल्ले स्वत: पाहिले. अनेकदा भ्रमंती केली. शिवरायांकडे आपण केवळ चरित्रनायक म्हणून पाहात नाही; तर त्यांच्या संपूर्ण चळवळीचे आयुष्य यावे, त्यांचे अष्टावधानी रूप निखळपणे पुढे यावे, हा आपला हेतू आहे. आपली लेखनी वाहवत जाणार नाही. राजकीय फायद्यापोटी किंवा जातीय अभिमानापोटी आपण हे साहित्य निर्मिले नाही, तर लेखकाने सच्चा इतिहास मांडावा, ही आपली त्यामागील भावना आहे. शिवरायांचे विराट स्वरूप सांगणे गरजेचे होते. त्यामुळे ही कादंबरी चार खंडांत येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला केशव-कृष्ण फाैंडेशनचे राजा भोयर उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यVishwash Patilविश्वास पाटील Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज