शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे 'शब्दस्मारक' लवकरच पूर्ण करणार - ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 13:14 IST

राज्य सरकार बांधणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकाआधी माझे शब्दस्मारक येणार असल्याचे प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले.

नागपूर : राज्य सरकार शिवरायांचे स्मारक उभारणार आहे. मात्र त्यांचे स्मारक व्हायचे तेव्हा होईल, त्यापूर्वीच आपले शब्दस्मारक आलेले असेल, असा विश्वास प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

नागपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपल्या महासम्राट या कादंबरीमालेची माहिती दिली. ते म्हणाले, महासम्राट ही कादंबरीमाला चार खंडांची असेल. त्यातील पहिला खंड ‘झंझावात’ लवकरच वाचकांपुढे येत आहे. यात शिवरायांच्या जन्मापूर्वीचे कथानक अर्थात शहाजीराजे यांच्या जीवनकार्याचा पट आहे. दुसरा खंड ‘रणखैंदळ’ या नावाने असून, १६६१ ते १६६४ त्यात शिवरायांच्या बालपणातील चार वर्षांचा काळ उभा केला आहे. आपल्या साहित्यकृतीवर वाचकांनी नितांत प्रेम केले आहे. याचेही ते स्वागत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवराय समजायचे असतील तर पिता, माता आणि शिवराय या त्रिकुटाला समजून घेतल्याशिवाय ते कळणार नाही. शूर असलेल्या शहाजीराजांनी भातोडीमध्ये १६२४ मध्ये पहिले गनिमीकाव्याचे युद्ध केले. एक लाख सैन्याविरुद्ध ते अवघे ४० हजारांचे सैन्य घेऊन येथील निसर्ग, दऱ्या, डोंगर, माती, भौगोलिक आणि नैसर्गिक स्थितीचा आधार घेऊन गनिमीकाव्याने लढले. तोच मार्ग शिवरायांनी अनुसरला. माता जिजाऊंनी शिवराय उदरात असताना जे दिवस भोगले, अवघ्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंना भर पावसात आश्रयासाठी फिरावे लागले, हा सर्व इतिहास कुठेच दिसत नाही.

पोर्तुगीजांच्या पत्रातून तो उघड होतो. हे लेखन करण्यासाठी आपण त्या सर्व ऐतिहासिक साहित्याचे अध्ययन केले. २५० किल्ले स्वत: पाहिले. अनेकदा भ्रमंती केली. शिवरायांकडे आपण केवळ चरित्रनायक म्हणून पाहात नाही; तर त्यांच्या संपूर्ण चळवळीचे आयुष्य यावे, त्यांचे अष्टावधानी रूप निखळपणे पुढे यावे, हा आपला हेतू आहे. आपली लेखनी वाहवत जाणार नाही. राजकीय फायद्यापोटी किंवा जातीय अभिमानापोटी आपण हे साहित्य निर्मिले नाही, तर लेखकाने सच्चा इतिहास मांडावा, ही आपली त्यामागील भावना आहे. शिवरायांचे विराट स्वरूप सांगणे गरजेचे होते. त्यामुळे ही कादंबरी चार खंडांत येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला केशव-कृष्ण फाैंडेशनचे राजा भोयर उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यVishwash Patilविश्वास पाटील Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज