शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 20:14 IST

दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुटी होती. ही सुटी तब्बल चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत होती. त्यामुळे शासकीय कार्यालय सलग चार दिवस बंद होते. बुधवारी कार्यालय सुरू झाले. मात्र या दिवशी अनेक कार्यालये ओस पडून होती. कर्मचारी कामावर आले नाही. जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही हाच प्रकार दिसून आला. निवडणुकीमुळे अनेक कामे प्रलंबित होती. त्यात आलेल्या चार दिवसांच्या सुटीमुळे कामाच्या फाईल्सचा ढीग वाढला. अनेक दिवसानंतर नियमित काम होणार असल्याने नागरिकही आशेत होते. त्यांचीही गर्दी वाढली होती. मात्र कार्यालयात कर्मचारी नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक जण विना परवानगी सुटीवर होते. यामुळे कामावर परिणाम झाला. बुधवारी सुटीवर असलेल्यांना जिल्हा प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २० च्यावर कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. काहींनी उत्तरही सादर केले. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचा बहाणा सांगितल्याची माहिती आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी