शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रेस्टॉरंटमध्ये सांभाळून ठेवा पाय; नागपूर अग्निशमन विभागाची २०३ जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:34 IST

गेल्या दीड महिन्यात मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट बार आदींची फायर स्टेशननुसार यादी तयार करून संवेदनशील बार व रेस्टॉरेंटला नोटीस जारी केली आहे.

ठळक मुद्दे२२ इमारती असुरक्षित घोषित१४ इमारतीतील वीज-पाणी कापण्याचे आदेश

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील बार आणि रेस्टॉरेंटमध्ये अनेक वर्षांपासून आगीपासून बचावाच्या सुरक्षेकडे लक्षच देण्यात आलेले नाही. अग्निशमन विभागाकडून कुठल्याही प्रकारची एनओसी घेतली जात नव्हती. परंतु मुंबईत एका रेस्टॉरंंटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने राज्य सरकारसह मनपा प्रशासन व अग्निशमन विभागाचे डोळे उघडले. गेल्या दीड महिन्यात मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट बार आदींची फायर स्टेशननुसार यादी तयार करून संवेदनशील बार व रेस्टॉरेंटला नोटीस जारी केली. सोबतच आगीपासून बचावाच्या सुरक्षेचे उपाय करण्यात आलेले आहेत, अशाच बार-रेस्टॉरंटमध्ये नागरिकांनी जावे, असा सल्लाही दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागातर्फे शहरातील एकूण २०३ हॉटेल, बार, रेस्टॉरंटची पाहणी करून कलम ६ अंतर्गत आगीपासून बचावाच्या उपाययोजना करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यात कलम ८(१) अंतर्गत २२ बार व रेस्टॉरंटच्या इमारतींना धोकादायक असल्याचे जाहीर करीत तेथून हटण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. याशिवाय १४ प्रतिष्ठानांमधील वीज-पाणीचे कनेक्शन कापण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व उपाययोजना करण्यासाठी महिनाभराची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल. बार- हॉटेल-रेस्टॉरंटला २०१५ मध्ये अग्निशमन विभागाची एनओसी घेण्याची अट रद्द करण्यात आली होती.केवळ १५ मीटर उंची असलेल्या इमारतींनाच नगररचना नियमानुसार आगीपासून सुरक्षा करण्याच्या उपायांसाठी अग्निशमन विभागाची एनओसी आवश्यक होती. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका बार-रेस्टॉरंटमध्ये आग लागून १४ लोक जिवंत जळाले. त्यानंतर प्रत्येक बार-रेस्टॉरंटला आगीपासून सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश जारी करण्यात आले. नागपुरातही रेस्टॉरंट व बारमध्ये अग्निशमन नियम आवश्यक करण्यात आले.१००० पेक्षा अधिक बार-रेस्टॉरंट२०१५ पूर्वीपर्यंत अग्निशमन विभागाकडे ७५० च्या जवळपास खाद्यगृह (इटिंग हाऊस) एनओसी घेत होते. परंतु सरकारने संबंधितांसाठी एनओसीची अट रद्द केली. त्यानंतर अग्निशमन विभागाकडे कुणीच फिरकले नाही. सध्या शहरात एक हजार पेक्षा अधिक बार, रेस्टॉरेंट असल्याची शक्यता आहे.

रुफटॉप रेस्टॉरंट धोकादायकलहान-मोठ्या रुफटॉप रेस्टॉरंटची संख्या शहरात एक वरून दीड डझनच्या जवळपास आहे. परंतु संबंधित रेस्टॉरंट संचालकांनी आगीपासून वाचण्याच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. अभ्यंकरनगरात काही दिवसांपूर्वी रुफटॉप रेस्टॉरंट तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. आग लागल्यास रुफटॉप रेस्टॉरंटमधून बाहेर निघणे अतिशय कठीण होते.

नियमित कारवाई सुरू -उचकेमनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, बार आणि रेस्टॉरंटमध्ये आगीपासून सुरक्षेचे उपाय करणे आवश्यक आहे. फायर स्टेशनमार्फत तपासणी अभियान सुरु आहे. जिथेही अनियमितता दिसून येते, त्यांना नोटीस जारी केले जात आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक नोटीस जारी करण्यात आले आहे. सात दिवस ते एक महिन्याची वेळ आगीच्या उपाययोजना करण्यासाठी देण्यात आलेली आहे. संंबधित संचालकांनी योग्य पाऊल उचलले नाही, तर इमारत असुरक्षित घोषित करून वीज-पाणी कापण्याचे आदेश जारी केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :fireआग