शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सक्षम अधिकारीच नाही, ‘फायर ऑडिट’ कसे झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:09 AM

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अगोदरच ‘कोरोना’ची लाट झेलत असलेल्या शहरातील वैद्यकीय क्षेत्रात वाडी येथील वेल ट्रीट ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अगोदरच ‘कोरोना’ची लाट झेलत असलेल्या शहरातील वैद्यकीय क्षेत्रात वाडी येथील वेल ट्रीट हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. इतकी भीषण घटना घडल्यानंतर संबंधित इस्पितळाचे नव्या नियमांनुसार ‘फायर’ तसेच ‘इलेक्ट्रिक ऑडिट’ झाले होते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘फायर ऑडिट’साठी सक्षम अधिकारीच नसल्याने इस्पितळाचे ‘फायर ऑडिट’ झाले नसल्याचा दावा एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला. आश्चर्याची बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये दहा नवजात बालकांचा जीव घेणाऱ्या घटनेला शुक्रवारी बरोबर तीन महिने झाले. मात्र, तरीदेखील शहरातील खाजगी व सरकारी रुग्णालयांनी त्यापासून काहीच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.

आजवर देशभरात अनेक इस्पितळांत आगी लागल्या व शेकडो रुग्णांनी जीव गमाविला. मात्र, तरीदेखील प्रशासकीय यंत्रणा व इस्पितळ प्रशासनांना जाग आलेली नाही. अग्निशमन यंत्रणेकडून वारंवार इशारा दिल्यानंतरदेखील इस्पितळांकडून नियमावलीचे पालन करण्यात येत नाही व त्याची परिणिती जीवघेण्या आगीमध्ये होते. मागील पाच वर्षांत देशभरामध्ये २० हून अधिक इस्पितळांत आगी लागल्या व १० वर्षांत तर शेकडो रुग्णांचे अशा आगींमध्ये बळी गेले.

अग्निशमन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेल ट्रीट हॉस्पिटल हे मनपा हद्दीत येत नाही. त्यामुळे त्याचे ‘फायर ऑडिट’ शहरातील यंत्रणेकडून होऊ शकत नाही. मनपाच्या हद्दीबाहेर ‘फायर ऑडिट’साठी सक्षम अधिकारीच नाही. त्यामुळे या हॉस्पिटलचे ‘फायर ऑडिट’ खरोखरच झाले होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘फायर एक्झिट’ची सोयच नाही

इस्पितळांना दर सहा महिन्यांनी ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करणे अत्यावश्यक असते. यासंदर्भात सरकारने कायदादेखील बनविला आहे. मात्र, नियमितपणे हे ‘ऑडिट’ होतच नाही. वेल ट्रिट हॉस्पिटलमध्ये ‘फायर एक्झिट’चीदेखील योग्य सोय नव्हती. शिवाय आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक यंत्रणेची कमतरता दिसून आली.

ऑक्सिजन सिलिंडरमुळे पसरली आग

अतिदक्षता विभागातील ‘एसी’मध्ये ‘शॉर्टसर्किट’ झाले व त्यामुळे आग पसरली, अशी माहिती इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात ‘आयसीयू’मध्ये प्राणवायूचे ‘सिलिंडर्स’ असतात. आग लागल्यानंतर ‘ऑक्सिजन’मुळे आग लवकर पसरते; परंतु या इस्पितळात ‘एसी’जवळ ही ‘सिलिंडर्स’ ठेवले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. इस्पितळात अत्याधुनिक वीजयंत्रणा नव्हती. यंत्रांचा वापर वाढत असताना विजेचे ‘पॅनल्स’ व ‘वायरिंग’ला बदलण्याकडे लक्ष दिले गेले नाही.