शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बटेंगे तो कंटेंगे’ नाही, तर ‘जियो और जिने दो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:12 IST

Nagpur : मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांचे उत्तर

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. यावर मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांनी ‘जियो और जिने दो’ असे म्हणत उत्तर दिले. देशात दोन विचार सुरू आहेत. एकीकडे धोका, विश्वासघात आहे तर दुसरीकडे विश्वास आहे. या निवडणुकीत विश्वासघात हरेल आणि विस्वास जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना जितु पटवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांमध्ये दरी वाढवली आहे. काही लोकांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आहे तर काही गरिबीमध्ये जगत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंतप्रधान मोदी हे नवा भारत म्हणतात, त्यात मोठ्या प्रमाणात आमदार खासदार यांची विक्री होते. रात्रीच्या अंधारात हे काम करतात. राज्यपाल सुद्धा कधी सरळ न बोलणारे शपथ विधी साठी रात्रभर जगतात. महाराष्ट्रातील सरकार हे धोकाधडी सरकार आहे. यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. अजित पवार सारखे लोक आहे ज्यांनी आधी भाजप वर टीका केली शिव्या दिल्या ते आता त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले आणि त्यांच्या सोबत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली.

मध्यप्रदेशातील गॅरंटी खोट्या निघाल्यामध्य प्रदेश सरकारने ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेशात लाडकी बहीण ला पैसे दिले जात आहे ते योग्य प्रकारे भेटत नाही आता महाराष्ट्रात तेच सुरू केलं लोकांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेस सर्वसाधारण लोकांसाठी विचार करते. जातगणनेची मागणी आम्ही केली आहे. महाविकास आघाडीने ज्या घोषणा केल्या त्या आम्ही पूर्ण करू, असा जितु पटवारी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर