शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 09:41 IST

कसब्यामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नागपूर : कसबा येथील विजयाचा विरोधकांकडून खूप उदो उदो केला जात आहे. मात्र, तेथील काँग्रेसचे उमेदवार हे केवळ  सहानुभूतीवर निवडून आले आहेत. येथे भाजपची मते कमी झाली नाहीत. ब्राह्मण समाज कधीही देश, देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसब्यामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.

पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, कसब्याची जागा भाजप हरला असला तरी चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही भाजप जिंकला. त्याच दिवशी तीन राज्यांचा निकाल आला असून, त्यात भाजपचा विजय झाला. विरोधक कितीही एकत्र आले तरी विजय भाजपचाच होणार. 

शरद पवारांनी निकाल पाहावे

  • राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कदाचित देशातील तीन राज्यांचे निकाल पाहिले नसावेत. त्यांनी ते निकाल अगोदर पाहावे. 
  • संपूर्ण काँग्रेस साफ झाली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर हा काँग्रेसचा पराभव आहे. 
  • राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत प्रवास योजना सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर नियमित प्रवास सुरू होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेkasba-peth-acकसबा पेठPuneपुणे