शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भाजपाचा विजय रथ कुणीही रोखू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:17 IST

भाजपाने या पाच वर्षात जेवढे विजय मिळविले तेवढे विजय गेल्या ७० वर्षात कुणालाही मिळविता आले नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही ते शक्य झाले नाही. भाजपाने ८० टक्के निवडणुका जिंकून विक्रम केला आहे. अशात एखादी पोटनिवडणूक हरलो म्हणून भाजपाची हवा उतरली असे होत नाही. कार्यकर्त्यांनो आत्मविश्वास ठेवा. भाजपाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा : एखादी पोटनिवडणूक हरल्याने फरक पडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाने या पाच वर्षात जेवढे विजय मिळविले तेवढे विजय गेल्या ७० वर्षात कुणालाही मिळविता आले नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही ते शक्य झाले नाही. भाजपाने ८० टक्के निवडणुका जिंकून विक्रम केला आहे. अशात एखादी पोटनिवडणूक हरलो म्हणून भाजपाची हवा उतरली असे होत नाही. कार्यकर्त्यांनो आत्मविश्वास ठेवा. भाजपाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी मुंबई येथे पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी खासदार अशोक नेते, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकरराव देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, डॉ. परिणय फुके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याच्या समारोपात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्यप्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन जागा हरलो. त्या जागा भाजपाच्या नव्हत्याच. त्यावेळी विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ज्या त्रिपुरामध्ये ९० टक्के लोक ख्रिश्चन आहेत, तेथे भाजपाने लाल बावटाची २५ वर्षांची सत्ता उलथून फेकली. दोन वर्षांपूर्वी त्रिपुरामध्ये अमित शहांच्या स्वागतासाठी विमानतळावर सहा लोक अले होते. तेथे परिश्रम घेतल्याने कमळ फुलले. मात्र, उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा हरताच पुन्हा चर्चा सुरू झाली. तेथे बसपा व सपा एकत्र आल्याने अनपेक्षित निकाल आला.पण चिंतेचे कारण नाही. त्याच गोरखपूरमध्ये भाजपाचा महापौरही जिंकला आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.राज्यात आपण नगर परिषदांपासून ते ग्राम पंचायतीपर्यंत जिंकलो आहोत. राज्यात भाजपाचे नगरसेवक २७२ वरून २००० झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये १२०० सदस्य झाले आहेत. थेट सरपंचाच्या निवडणुकीत भाजपाचे तब्बल १० हजार सरपंच विजयी झाले आहेत. मुळात आपण या यशाचा उत्सवच साजरा केला नाही. त्यामुळे अधूनमधून होणारा एखादा पराभव चिंतेचे वातावरण निर्माण करतो. आता पक्षाच्या स्थापना दिनी मुंबईत उत्सव साजरा करू. महामेळाव्यात गर्दी करून असे विराट दर्शन घडवा की ते पाहून कार्यकर्ते आपोआप कामाला लागतील, असेही त्यांनी सांगितले. राज्यात ९७ हजार पैकी ८४ हजार बूथ स्थापन करण्यात आले आहेत व यापैकी ८१ हजार बूथची पडताळणी पूर्ण झाली आहे. राज्यात पक्षाचे एवढे मोठे संघटन उभारण्यात आले आहे. स्थापना दिवसासाठी प्रत्येक जिल्ह्याने पाच हजार कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट स्वीकारले आहे. खरे तर हा आकडा कमीच आहे. जेव्हा कुठलीही व्यवस्था नव्हती तेव्हा देखील भाजपाने लाखोंचे मोर्चे काढले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक बूथवरून किमान १० लोक यावेत, तेव्हाच मुंबईत विराट दर्शन घडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा