शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नदीत नाही पाणी अन् लाखोंची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:37 IST

हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपा जलप्रदाय विभागाचा प्रस्ताव : अभ्यासासाठी ‘पीएमसी’वर ९७.६२ लाख खर्च करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कन्हान नदीपात्रात पाणी नसल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील ‘इन्टेक वेल’मधून पूर्णक्षमतेने पाण्याची उचल करताना अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसात २५ एमएलडी पाणी कमी उचलण्यात आले. यामुळे पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुसंख्य भागाला अपेक्षित पाणीपुरवठा करता आला नाही. खापानजीकच्या कोच्छी गावाजवळ नदीवर बंधारा उभारण्यात आल्याने कन्हान नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत नाही. हा पाणीपुरवठ्यासाठी धोक्याची इशारा मानला जात आहे.दरम्यान जलप्रदाय विभागातर्फै स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. या प्रस्तावात जून-जुलै ते डिसेंबर दरम्यान कन्हान नदीत भरपूर पाणी असते. या कलावधीत रोहणा गावाजवळ नदी पात्रातील पाण्याची उचल करुन पेंच प्रकल्पापर्यंत वाहून नेण्यासाठी २३०० मि.मी.व्यासाची जलवाहिनी व तेथून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धकीरण केंद्रापर्यंत पोहचवण्याचा विचार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी व संबंधित प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प प्रबंधन सल्लागाराची नियुक्ती करावयाची आहे. याबाबतच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर सल्लागाराला ९७ लाख ६२ हजार २१० रुपये अदा करण्यात येतील.विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी काही नगरसेवक नी कन्हान नदीवर बंधारा उभारण्याची मागणी केली होती. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर दोन कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु हा प्रस्ताव विचारात घेतला नव्हता.टँकरने पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढविलामहापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर निश्चित क रण्यात आले आहेत. निविदा काढून निश्चित दरानुसार काम दिले जाते. ३१ ऑक्टोबर २०१८ला या निविदांचा कालावधी संपला. तो वाढवून ३१ जानेवारी २०१९ पर्यंत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला जाणार आहे. यात २ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३२८ रुपये, ३ हजार लिटरच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३५८ रुपये, ४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३८६ तर ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ४२४ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी