शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नदीत नाही पाणी अन् लाखोंची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:37 IST

हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपा जलप्रदाय विभागाचा प्रस्ताव : अभ्यासासाठी ‘पीएमसी’वर ९७.६२ लाख खर्च करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कन्हान नदीपात्रात पाणी नसल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील ‘इन्टेक वेल’मधून पूर्णक्षमतेने पाण्याची उचल करताना अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसात २५ एमएलडी पाणी कमी उचलण्यात आले. यामुळे पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुसंख्य भागाला अपेक्षित पाणीपुरवठा करता आला नाही. खापानजीकच्या कोच्छी गावाजवळ नदीवर बंधारा उभारण्यात आल्याने कन्हान नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत नाही. हा पाणीपुरवठ्यासाठी धोक्याची इशारा मानला जात आहे.दरम्यान जलप्रदाय विभागातर्फै स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. या प्रस्तावात जून-जुलै ते डिसेंबर दरम्यान कन्हान नदीत भरपूर पाणी असते. या कलावधीत रोहणा गावाजवळ नदी पात्रातील पाण्याची उचल करुन पेंच प्रकल्पापर्यंत वाहून नेण्यासाठी २३०० मि.मी.व्यासाची जलवाहिनी व तेथून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धकीरण केंद्रापर्यंत पोहचवण्याचा विचार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी व संबंधित प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प प्रबंधन सल्लागाराची नियुक्ती करावयाची आहे. याबाबतच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर सल्लागाराला ९७ लाख ६२ हजार २१० रुपये अदा करण्यात येतील.विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी काही नगरसेवक नी कन्हान नदीवर बंधारा उभारण्याची मागणी केली होती. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर दोन कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु हा प्रस्ताव विचारात घेतला नव्हता.टँकरने पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढविलामहापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर निश्चित क रण्यात आले आहेत. निविदा काढून निश्चित दरानुसार काम दिले जाते. ३१ ऑक्टोबर २०१८ला या निविदांचा कालावधी संपला. तो वाढवून ३१ जानेवारी २०१९ पर्यंत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला जाणार आहे. यात २ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३२८ रुपये, ३ हजार लिटरच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३५८ रुपये, ४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३८६ तर ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ४२४ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी