शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:26 IST

नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देचिन्हांकन झालेच नाही : आता मनपाने पाठविला सिंचन विभागाकडे प्रस्ताव

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने काठावरील वस्त्यांना धोका होतो. त्यासाठी धोक्याची जागा चिन्हांकित केली जाते. त्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु सिंचन विभागाने नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

शहरात नागनदी, पिवळी व पोहरा नदी जाते. या नद्याच्या काठावर ५ हजारावर घरे आहेत. त्यात हजारोंच्या संख्येने कुटुंब राहत असून त्यांचा जीव धोक्यात आहे. मनपाने नदी काठावरील धोक्याची जागा चिन्हांकित करण्यासाठी सिंचन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. 

नदीच्या पात्राजवळील जवळपास ५०० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नको, असा नियम आहे. देशातील अनेक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांना पुराचा धोक्याची मार्किंग ब्रिटिश शासन काळापासून केली जाते. परंतु नागपुरातून वाहणाऱ्या नागनदी, पोहरा नदी, पिवळी नदीच्या पुराच्या धोक्याो मार्किंगच करण्यात आलेले नाही. १३ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्यापावसाने नागपुरात अनेक घरे पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी जवळपास ४०० घरात शिरले होते. मनपाच्या प्रादेशिक आपात्कालीन सेल आणि मनपाच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत शहराच्या १२१ भागांमध्ये 'अतिधोकादायक' अशी नोंद असून यात ३८५३ घरांचा समावेश आहे.

धोकादायक वस्त्या

महापालिकेच्या दोन्ही सेलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टी, धरमपेठ कॉलेजमागील भाग, तेलंगखेडी तलावामागील भाग, धरमपेठेतील गवळीपुरा, काटोल रोडवरील शीलानगर, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, इमामवाड्यातील सिरसपेठ, जुनी शुक्रवारी, तुळशीबाग, नंदनवन ले-आऊट, भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, पडोळेनगर, आदर्शनगर, संजयनगर, कुंभारटोली, ताजनगर, वांजरा, नारी, झिंगाबाई टाकळी आणि सक्करदरा तलावामागील भागाचा आदी धोकादायक वस्त्यांचा समावेश आहे.

नदीची सुरक्षा महत्वाची

पुराच्या धोक्याचे मार्किंग नदी काठावर वसलेली घरे आणि नदीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. नदीवर अतिक्रमण करून घरे बनविल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. तसेच जैवविविधतेचे नुकसान होते. जागा चिन्हाकिंत केल्याने बांधकामे रोखता येऊ शकतात. परंतु, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूरriverनदी