शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:26 IST

नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देचिन्हांकन झालेच नाही : आता मनपाने पाठविला सिंचन विभागाकडे प्रस्ताव

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने काठावरील वस्त्यांना धोका होतो. त्यासाठी धोक्याची जागा चिन्हांकित केली जाते. त्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु सिंचन विभागाने नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

शहरात नागनदी, पिवळी व पोहरा नदी जाते. या नद्याच्या काठावर ५ हजारावर घरे आहेत. त्यात हजारोंच्या संख्येने कुटुंब राहत असून त्यांचा जीव धोक्यात आहे. मनपाने नदी काठावरील धोक्याची जागा चिन्हांकित करण्यासाठी सिंचन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. 

नदीच्या पात्राजवळील जवळपास ५०० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नको, असा नियम आहे. देशातील अनेक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांना पुराचा धोक्याची मार्किंग ब्रिटिश शासन काळापासून केली जाते. परंतु नागपुरातून वाहणाऱ्या नागनदी, पोहरा नदी, पिवळी नदीच्या पुराच्या धोक्याो मार्किंगच करण्यात आलेले नाही. १३ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्यापावसाने नागपुरात अनेक घरे पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी जवळपास ४०० घरात शिरले होते. मनपाच्या प्रादेशिक आपात्कालीन सेल आणि मनपाच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत शहराच्या १२१ भागांमध्ये 'अतिधोकादायक' अशी नोंद असून यात ३८५३ घरांचा समावेश आहे.

धोकादायक वस्त्या

महापालिकेच्या दोन्ही सेलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टी, धरमपेठ कॉलेजमागील भाग, तेलंगखेडी तलावामागील भाग, धरमपेठेतील गवळीपुरा, काटोल रोडवरील शीलानगर, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, इमामवाड्यातील सिरसपेठ, जुनी शुक्रवारी, तुळशीबाग, नंदनवन ले-आऊट, भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, पडोळेनगर, आदर्शनगर, संजयनगर, कुंभारटोली, ताजनगर, वांजरा, नारी, झिंगाबाई टाकळी आणि सक्करदरा तलावामागील भागाचा आदी धोकादायक वस्त्यांचा समावेश आहे.

नदीची सुरक्षा महत्वाची

पुराच्या धोक्याचे मार्किंग नदी काठावर वसलेली घरे आणि नदीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. नदीवर अतिक्रमण करून घरे बनविल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. तसेच जैवविविधतेचे नुकसान होते. जागा चिन्हाकिंत केल्याने बांधकामे रोखता येऊ शकतात. परंतु, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूरriverनदी