शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:26 IST

नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देचिन्हांकन झालेच नाही : आता मनपाने पाठविला सिंचन विभागाकडे प्रस्ताव

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने काठावरील वस्त्यांना धोका होतो. त्यासाठी धोक्याची जागा चिन्हांकित केली जाते. त्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु सिंचन विभागाने नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

शहरात नागनदी, पिवळी व पोहरा नदी जाते. या नद्याच्या काठावर ५ हजारावर घरे आहेत. त्यात हजारोंच्या संख्येने कुटुंब राहत असून त्यांचा जीव धोक्यात आहे. मनपाने नदी काठावरील धोक्याची जागा चिन्हांकित करण्यासाठी सिंचन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. 

नदीच्या पात्राजवळील जवळपास ५०० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नको, असा नियम आहे. देशातील अनेक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांना पुराचा धोक्याची मार्किंग ब्रिटिश शासन काळापासून केली जाते. परंतु नागपुरातून वाहणाऱ्या नागनदी, पोहरा नदी, पिवळी नदीच्या पुराच्या धोक्याो मार्किंगच करण्यात आलेले नाही. १३ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्यापावसाने नागपुरात अनेक घरे पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी जवळपास ४०० घरात शिरले होते. मनपाच्या प्रादेशिक आपात्कालीन सेल आणि मनपाच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत शहराच्या १२१ भागांमध्ये 'अतिधोकादायक' अशी नोंद असून यात ३८५३ घरांचा समावेश आहे.

धोकादायक वस्त्या

महापालिकेच्या दोन्ही सेलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टी, धरमपेठ कॉलेजमागील भाग, तेलंगखेडी तलावामागील भाग, धरमपेठेतील गवळीपुरा, काटोल रोडवरील शीलानगर, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, इमामवाड्यातील सिरसपेठ, जुनी शुक्रवारी, तुळशीबाग, नंदनवन ले-आऊट, भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, पडोळेनगर, आदर्शनगर, संजयनगर, कुंभारटोली, ताजनगर, वांजरा, नारी, झिंगाबाई टाकळी आणि सक्करदरा तलावामागील भागाचा आदी धोकादायक वस्त्यांचा समावेश आहे.

नदीची सुरक्षा महत्वाची

पुराच्या धोक्याचे मार्किंग नदी काठावर वसलेली घरे आणि नदीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. नदीवर अतिक्रमण करून घरे बनविल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. तसेच जैवविविधतेचे नुकसान होते. जागा चिन्हाकिंत केल्याने बांधकामे रोखता येऊ शकतात. परंतु, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूरriverनदी