शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नदीकाठावरील ५ हजार घरे कधीही येऊ शकतात धोक्यात; 'या' भागातील वस्त्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 17:26 IST

नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देचिन्हांकन झालेच नाही : आता मनपाने पाठविला सिंचन विभागाकडे प्रस्ताव

नागपूर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पावसाळ्यात पूर आल्याने काठावरील वस्त्यांना धोका होतो. त्यासाठी धोक्याची जागा चिन्हांकित केली जाते. त्यावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु सिंचन विभागाने नागपूर शहरातून वाहणाऱ्या नदीच्या काठावरील कोणतीही जागा चिन्हांकित केली नाही. यामुळे वस्ती वाढत जाऊन आता नदीकाठावरील ५ हजारावर घरे धोक्यात आली आहेत.

शहरात नागनदी, पिवळी व पोहरा नदी जाते. या नद्याच्या काठावर ५ हजारावर घरे आहेत. त्यात हजारोंच्या संख्येने कुटुंब राहत असून त्यांचा जीव धोक्यात आहे. मनपाने नदी काठावरील धोक्याची जागा चिन्हांकित करण्यासाठी सिंचन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. 

नदीच्या पात्राजवळील जवळपास ५०० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम नको, असा नियम आहे. देशातील अनेक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यांना पुराचा धोक्याची मार्किंग ब्रिटिश शासन काळापासून केली जाते. परंतु नागपुरातून वाहणाऱ्या नागनदी, पोहरा नदी, पिवळी नदीच्या पुराच्या धोक्याो मार्किंगच करण्यात आलेले नाही. १३ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्यापावसाने नागपुरात अनेक घरे पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी जवळपास ४०० घरात शिरले होते. मनपाच्या प्रादेशिक आपात्कालीन सेल आणि मनपाच्या अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीत शहराच्या १२१ भागांमध्ये 'अतिधोकादायक' अशी नोंद असून यात ३८५३ घरांचा समावेश आहे.

धोकादायक वस्त्या

महापालिकेच्या दोन्ही सेलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टी, धरमपेठ कॉलेजमागील भाग, तेलंगखेडी तलावामागील भाग, धरमपेठेतील गवळीपुरा, काटोल रोडवरील शीलानगर, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, इमामवाड्यातील सिरसपेठ, जुनी शुक्रवारी, तुळशीबाग, नंदनवन ले-आऊट, भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, पडोळेनगर, आदर्शनगर, संजयनगर, कुंभारटोली, ताजनगर, वांजरा, नारी, झिंगाबाई टाकळी आणि सक्करदरा तलावामागील भागाचा आदी धोकादायक वस्त्यांचा समावेश आहे.

नदीची सुरक्षा महत्वाची

पुराच्या धोक्याचे मार्किंग नदी काठावर वसलेली घरे आणि नदीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. नदीवर अतिक्रमण करून घरे बनविल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. तसेच जैवविविधतेचे नुकसान होते. जागा चिन्हाकिंत केल्याने बांधकामे रोखता येऊ शकतात. परंतु, याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूरriverनदी